दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
चांदुर बिस्वा (नांदुरा) देि.६
मागील वर्षी दिवाळी पासून पगार वाढीसाठी व इतर काही मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी संपाचे बंड पुकारले तेव्हा पासून सामान्य प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत आहे. काही मागण्या पूर्ण होताच हा संप संपुष्टात आला आहे. गेल्या आठ दिवसापासून बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहे. परंतु ग्रामीण भागातील बसफेऱ्या अध्यापही बंद आहे. या बस सेवा सुरू करण्याकरिता चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोष पाटील यांनी आगार प्रमुख मलकापूर विभाग यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे. या अगोदर मलकापूर -जिगाव, मलकापूर -चांदुर बिस्वा ही बस सेवा सुरू होती. बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आणि हे सेवा विस्कळीत झाली. परंतु संप संपुष्टात येऊन सुद्धा अद्यापही मलकापूर जिगाव हे बस सेवा पूर्ववत सुरू न झाल्याने सामान्य प्रवासी वर्गाला आर्थिक भुर्दंड पडत असून अतोनात हाल होत आहे. सदर अवैद्य प्रवासी वाहतूक करणारे मनमानी करत अव्वाचे सव्वा भाडे आकारत आहेत. सामान्य जनता, प्रवासी वर्गातून बसेसची मागणी होत असून पूर्वी ज्या वेळेत सुरू होत्या त्या वेळेतच पूर्ववत सुरू करण्यात याव्यात व सामान्य जनतेला या त्रासापासून मुक्त करावे असे अभय पाटील यांनी मलकापूर आगार प्रमुखाला निवेदनाद्वारे म्हटले आहे.