बाळा पाटील जाधव यांचा इशारा
दै चालु वार्ता औरंगाबाद
मोहन आखाडे
विकासकामे होत नसल्याने आक्रमक
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या शिऊर ग्रामपंचायतीकडे निधी असूनही विकासकामे होत नसून दोन दिवसात गावात विकासकामे सुरू केले नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावू असा इशारा शिऊर ग्रामपंचायतीचे सदस्य बाळा पाटील जाधव यांनी दिला आहे.
शिऊर ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने गावाची धुरा हाती घेतली, यात बाळा पाटील जाधव यांच्यासह काही सदस्य विरोधी बाकावर आहेत.
१५ वा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध झाला असून हा निधी खर्च करत गावात विकासकामे करण्यात यावे या बाबत आम्ही मासिक बैठकीत आग्रही भूमिका मांडत आहोत, मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येत आहे.
शिऊर गावात नाली, रस्ते, लाईट याबाबत नियोजन करून विकास कामे करण्यात यावे अशी आमची भूमिका आहे, येत्या दोन दिवसात यावर प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचे बाळा जाधव यांनी सांगितले.