दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यात महापूर आला त्यामुळे प्रचंड प्रमाणत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पंचनामा करण्याबाबतची अट रद्द करून दीपावली पूर्वी सरसकट मदत करावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांना केज मतदारसंघाच्या भाजपा आमदार नमिताताई मुंदडा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे शेतजमिनीचे व शेतातील पिकांचे सोयाबीन, ऊस, व खरीप हंगामातील सर्व पिकांचे (बागायती पिकांचे भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे नुकसानच नाही तर अख्ख पिक वाहून गेले आहे. काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या दोन महिन्यात वाहून गेल्या, तसेच राज्यमार्ग, वस्ती राज्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीणरस्ते, पांदन रस्ते, व पुलांचे अत्यंत नुकसान झाले आहे. रस्ते व पुले नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दळणवळण वाहतूक बंद झाली गग्रामीण भागात बसेस बंद झाल्या वाहन जात नाहीत, अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.