दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- कवि सरकार इ़ंगळी
पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे सुपुत्र, साहित्यिक कवी डॉ खंडू माळवे यांना दि 18/9/2022 दैनिक रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्कार संपादक शाहू संबाजी भारती व विठ्ठल आंधळे यांचे हस्ते मिळाला याअगोदर गुरूब्रम्हा जीवन गौरव पुरस्कार हा सिंधुताई सकपाळ यांचे हस्ते मिळाला त्याचप्रमाणे सावली जीवन गौरव पुरस्कार भालचंद्र मुंगणेकर व संजय साळगावकर यांचे हस्ते मिळाला डॉ खंडू माळवे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याने थोडक्यात सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत नव्हे तर महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष आहेत त्याच प्रमाणे मुंबई वृत्तपत्र लेखक संघ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत त्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळाने काव्यसंग्रह चाळणीवाला 2013 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते
प्रकाशित करण्यात आला. एकून पाच हजार कविता व हस्तलिखित लाखान केल्याने महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, भारत बुक ऑफ रेकॉर्ड, नोंद आहे संतसाहित्य 500अभंग लिखित आहे तसेच चित्रपटात काम केलेले असे हे अष्टपैलू कलाकार असल्याने महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ व चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आह