दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नांदेड : – देशात उज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनचे वाटप केले. गॅस सिलेंडरची दरवाढ होतच राहिली कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना शंभर रुपयात गॅस सिलेंडरच्या किमती अकराशे रुपया पर्यंत पोहोचल्या आहेत कनेक्शन मोफत आहे परंतु सिलेंडर ला एक हजार रुपये मोजायचे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे महागाईमुळे गरीब लाभार्थी पुन्हा चूलीकडे वळले असून उज्वला च्या नशिबी पुन्हा चूल असे म्हणावे लागत आहे एक प्रकारे गोरगरीब नागरिकांची कुटुंबाची थट्टा चालवली आहे. की काय ? असा प्रश्न देखील पुन्हा उपस्थित होत आहे अशीच महागाई वाढत चालली आणि योजनेची थट्टा होत चालली तर येणाऱ्या काळात गोरगरीब जनता मोफतच्या मिळणाऱ्या योजना सुद्धा घेणार नाही हेही तितकेच खरे आहे. टाकी खेडेगावात 1100 रुपयाला सबसिडी बंद मग काय चला चुलीकडे उज्वला योजनेचे कनेक्शन मोफत मिळाले असले तरी टाकी अकराशे रुपयाला झाली आहे गरीब नागरिकांनी गॅस सिलेंडरचा वापर बंद करून पुन्हा चूल पेटवली आहेत गॅस वरती सबसिडी बंद केल्यात जमा आहे त्यामुळे गॅस ऐवजी पुन्हा चुलीवर स्वयंपाकाची वेळ आल्याच सध्या दिसून येत आहे.
खेड्यातील महिलांची आर्त हाक ; बाई आपली चूलच बरी
आम्ही उज्वला योजनेचे गॅस कनेक्शन घेतले त्या वेळी आनंद झाला परंतु दोन वर्षात गॅस सिलेंडर च्या किमती वाढल्या आधीच महागाईमुळे परपंच याचा मेळ बसेना त्यात टाकीला हजार रुपये लागतात त्यामुळे तुला बरी म्हणण्याची वेळ आली आहे . अशा गावोगावच्या महिला बोलू लागल्या आहेत.