दैनिक चालु वार्ता रायगड /म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील संसद ग्राम खरसईने तालुक्याला आदर्श ठरावा असा कार्यक्रम नुकताच घेतला गावातील वैकुंठ स्मशानभूमीचे सुशोभीकरण करून कार्यक्रम स्थानिक वृध्द दानशूर माहिला काशीबाई तुकाराम शीतकर आणि पुत्र राजेश तुकाराम शितकर यांच्या आणि मान्यवरांचे हस्ते पूजन करून लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमांत सुशोभीकरण,परिसर स्वच्छता ,वॉलकंपाऊंड ,स्मशान शेड असे सुमारे रु २० लक्षचे काम झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्राम अध्यक्ष नामदेव पदा खोत ,उपाध्यक्ष नथुराम मांदाडकर, सचिव दत्ताराम पयेर, विनोद म्हसकर,माजी सरपंच निलेश मांदाडकर, उबाठा शिवसेनेचे नेते व उद्योजक अनंत भाई कांबळे, हरीचद्र कांबळे .पांडुरंग खोत, महादेव नाक्ती, परशुराम मांदाडकर,बाळाराम पयेर,तानाजी म्हात्रे,नारायण खोत,कोळी समाज अध्यक्ष भांजी भुनेसर आदी स्थानिक व मुंबई निवासी महीला मंडळाचे पदाधिकारी बहुसंखेने उपस्थित होते.वृध्द दानशूर माहिला काशीबाई तुकाराम शीतकर आणि पुत्र राजेश तुकाराम शितकर,आमदार अनिकेत तटकरे यांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंर्तगत निधी,शिवगर्जना क्रिडा मंडळ , ग्रामपंचायत खरसई,पंचायत समिती आणि जिल्हापरिषद, स्थानिक आणि मुंबई मंडळ, महीला मंडळ यांचा सक्रीय पाठींबा होता .खरसई ग्रामस्थानी स्तुत्य उपक्रमाने तालुक्यात आदर्श व्रत काम केले त्याचे तालुक्यांत कौतुक होत आहे.