दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: आदमपूर येथील एका महिला शेतकऱ्याच्या शेतातील चार एकर जमिनीतील हरभरा व धन्याच्या पिकाची काढणी करुन एका ठिकाणी जमा करुन घातलेल्या गंजीला अज्ञाताने आगीने पेटवल्याने संपूर्ण हरभरा व धन्याची गंजी जळून राख झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे जवळपास लागवडी सहित अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील असलेल्या महिला शेतकरी रेखा अशोक इंगळे यांनी थडीसावळी शिवारालगत असलेली त्यांच्या मालकीचे शेती गट क्र. ३३२मधील एकूण ४ एकर जमिनीत साडेतीन एकर हरभरा व अर्धा एकर धन्याची लागवड केली होती. मागील आठ दिवसांपूर्वी दोन्ही पिकांची काढणी करुन हरभरा व धन्याच्या वेगवेगळ्या दोन गंजी तयार करून मळणीयंत्राद्वारे रास करण्याचेउद्देशाने ठेवल्या होत्या. परंतु वेळेवर मळणीयंत्र मिळत नसल्याने रास करण्यास उशीर होत होता. त्यातच २१ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञाताने रचून ठेवलेल्या हरभरा व थना पिकाच्या दोन्ही गंजीला आग लावून पेटवून दिले. हीबाब मुतन्याळ येथील एका नागरिकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने महिला शेतकरी यांचे पती अशोक इंगळे यांना ही बाब कळवली. त्यांनी लागलीच शेताकडे धाव घेतली. परंतु त्यांनी शेतात येईपर्यंत हरभरा वधना या पिकाच्या दोन्ही गंजी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्याचे दोन लाखाचा हरभरा व ३० हजाराचे धने पिकाचे लागवडीसहित होणारे उत्पन्न अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे अज्ञाताने लावलेल्या नुकसान झाले आहे. आगीत
नुकसानग्रस्त संबंधित महिला शेतकरी यांचे पती अशोक इंगळे यांनी सदरील वृत्त लिहीपर्यंत रामतीर्थ पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात फिर्याद देण्यासाठी आली.