दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
धम्म परिषदेचे उद्घाटन बोधी वृक्षाला पाणी घालून करण्यात आले
भूम : शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पहिल्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . ही धम्म परिषद हजारो बौद्ध उपासक तथा उपासिका यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाली . रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी परंडा रोड भूम येथील यश मंगल कार्यालय मध्ये ही धम्मपरिषद आयोजित करण्यात आली होती . या आयोजित करण्यात आलेल्या या धम्म परिषदेमध्ये सकाळी बुद्ध विहार भीम नगर येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून धम्म रॅली यश मंगल कार्यालय येथे संपन्न झाली . यानंतर भदंत्त डॉ हर्षबोधी (औरंगाबाद) , भदंत्त धम्मदीप (यवतमाळ) , भदंत्त संघपाल (आसाम), भदंत्त नागघोष (पुणे) , भदंत्त बुद्धभूषण (औरंगाबाद) ,भदंत्त जयंतबोधी(सिक्कीम) , भदंत्त संघरत्न (औरंगाबाद), भदंत्त एस राहुल(औरंगाबाद) , भदंत्त संघानंद(औरंगाबाद) , भदंत्त सुमंगल (करळी – उस्मानाबाद), भदंत्त आर्याजी रुपनंदा (हिंगोली) यांच्या हस्ते या धम्म परिषदेचे बोधी वृक्षाला (पिंपळ) पाणी घालून उद्घाटन करण्यात आले . यावेळी शाहीर बाबासाहेब राजगुरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी भीम गीतांचे सादरीकरण केले . उपस्थित बौद्ध उपासक तथा उपासिका यांच्यासाठी उद्योजक प्रविण रणबागुल यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती . बौद्ध उपासक तथा उपासीका यांनी बौद्ध धर्मातील विचारांचे अनुकरण करावे . आपणास जर प्रगती करावयाची असेल तर बुद्धांच्या मार्गानेच शक्य आहे असेही यावेळी बौद्ध भिक्खूंनी सांगितले . बदलत आर्याजी रूपनंदा यांनी सांगितले की रमाई जयंतीच्या दिवशी महिलांनी नटून-खटून जयंती साठी गेले पाहिजे . समाजातील प्रत्येकानेच मीपणा सोडून बुद्ध , रमाई , डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे . या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी समाजातील कोणीही आमंत्रण , निमंत्रण मिळण्याची , कोणीतरी बोलावण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे हा कार्यक्रम सर्वांचा आहे त्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी सहभागी होणे गरजेचे आहे . ही धम्मपरिषद खूप यशस्वी झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले . धम्म परिषदेच्या निमित्ताने भूम शहरांमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खूंची हजेरी लागली होती त्यामुळे बौद्ध बांधवांनी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकच गर्दी केली . यावेळी धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष आर के सुकाळे , कांतीलिंग थोरात , विनायक मस्के , दत्तात्रय पालके , वसंत वाघमारे , मेघराज गायकवाड , प्रदीप चंदनशिवे , बापूराव सोनवणे , दत्तात्रय पाटोळे यांच्यासह सहयोगी संयोजन समितीने परिश्रम घेतले .