दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी .
……………………..
शाळा हे संस्काराचे केंद्र होऊन सुसंस्कारित पिढी शाळेतून घडावी. आमच्या शिवशंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काही महिन्यातच तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही दैदिप्यमान यश मिळवून आमची मान उंचावली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन करून शाळेतुन यशवंत,गुणवंत विद्यार्थी घडावे आणि ही संस्कारित पिढी उद्याच्या राष्ट्राचे भावी आधारस्तंभ होतील असा गौरवोद्गार काढले. ते श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता. देगलूर येथील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ व बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून कवी व्यंकट अनेराये सर होते.कवी अनेराये सर यांनी आता ज्ञानाच्या जोरावर गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यास यश सहज प्राप्त होते असा सल्ला दिल.पाहुणे म्हणून श्री कांतराव देसाई,गोविंद पाटील, वन्नाळीचे चेअरमन, यशवंत पाटील, मु.अ.भोसले सर मु.अ.जाधव सर,मु.अ.गोपाळ मेहत्रे सर,मु.अ. बिरादार सर,मु.अ.ईक्रामोद्दीन सर हे उपस्थित होते.या कार्यक्रमास चेअरमन यशवंतराव पाटील,तूप शेळगाव चे नागरिक मारुती वाघमारे,लख्याचे सरपंच सुर्यकांत पाटील, सय्यद रसूल,भूमा कोरेवार, हे उपस्थित होते.राष्ट्रमाता माॅ जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थिनीच्या स्वागतगीता नंतर मुख्याध्यापक श्री सुरेश वनंजे सर यांनी शाळेच्या यशस्वीते बद्दल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख प्रस्तावनेतून मांडला.त्यानंतर राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा नृत्य आविष्कार सादर करण्यात आला.धनश्री भाले,ऋतुजा वाघमारे,प्रियंका बामणे,ऋतुजा वाघमारे, ह्या विद्यार्थिनींचा तालुका,जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वीते बद्दल आदरणीय बाळासाहेब पाटील खतगावकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कलाध्यापक तथा कवी बालाजी पेटेकर यांची शंकर दरबार या मानाच्या कवी संमेलनासाठी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब पाटील खतगावकर व व्यंकट अनेराये व मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय समारोप करताना संस्था सचिव मा.बाळासाहेब पाटील खतगावकर यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदीप्यमान विजयाबद्दल विद्यार्थ्यासह शिक्षकांचे कौतुक केले.आणि शाळेच्या या यशस्वी घोडदौडी बद्दल शुभेच्छा दिल्या.त्यांनी आपल्या मनोगतात सद्यस्थितीत वाढत चाललेल्या वृद्धाश्रमाबद्दल चिंता व्यक्त केली आणि आई-वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असा सल्ला सर्वांना दिला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कलाध्यापक बालाजी पेटेकर सर यांनी केले तर आभार विठ्ठल वाघमारे सर यांनी मानले. यावेळी परिसरातील पालक उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी राजेश बामणे,धनाजी पा.मोरे, आनंद दिमलवाड,विठ्ठल वाघमारे, माधव कदम,दिगंबर खिसे, बालाजी पेटेकर सौ.अंजली देशमुख,बालाजी बारडवार दिलीप पाटील अंकमवार मामा आदींनी परिश्रम घेतले.