दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
लातुर/अहमदपूर:
शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून हा कणा मोडण्याचा प्रयत्न होताना दिसत असून ,महावितरण कंपनीच्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय किसान मोर्चा अहमदपूर मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
शेतीक्षेत्रात येणाऱ्या अडचणी पेक्षा सरकारी यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी वर्ग जास्त अडचणीत आहे तसेच शेतकरी फक्त उत्पादन करणारा उत्पादक बनून राहिला असून त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसून त्याची पिळवणूक सर्रास होताना दिसून येत आहे. बळीराजा हा राजा नसून शासनाच्या धोरणात एक कटपुतली बनून राहिला आहे.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी ह्या कागदावर राहिल्या असून ,काँग्रेस ,भाजपा असो या अन्य कोणतेही सरकार शेतकऱ्यास आजवर न्याय देण्यात अपयशी ठरले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा देशातील शेतकऱ्यांना का देण्यात येत नाहीत असा प्रश्न शेतकरी करतांना दिसत आहेत.शेती क्षेत्रा संबंधित खते ,बियाणे आणि औषधांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या असून उत्पादनांना मात्र भाव मिळत नाही .उत्पादन खर्च वाढला मात्र भाव मात्र वाढताना दिसत नसून शेतकरी आता हताश झाला आहे.शेतकऱ्यांच्या नैसर्गिक समस्यापेक्षा सरकारी धोरणामुळे वाढलेल्या समस्या ह्या भयावह आहेत .याच समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे सरकारकडे मागणी केली असून तात्काळ यावर निर्णय घ्यावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन आणि मोर्चे काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला .त्या प्रसंगी उपस्तिथ प्रोटॉन चे जिल्हाध्यक्ष श्री सतीश ननीर सर,तालुकाध्यक्ष संतोषकुमार रेड्डी भसमपुरे,तालुका उपाध्यक्ष विष्णुकांत पोले,राजीव पाटील मुकनर,धनंजय सुरनर,आणी इतर सर्व कार्यकर्ते उपस्तिथ होते.