दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
कंधार तालुका हा परिक्षात काॅफी मारण्याच्या बाबतीत नावलौकिक असल्याने बदनाम झाला आहे. हा लागलेला दाग पुसुन काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक व तहसीलदार अणुपसिंह यादव यांनी चांगलीच कंबर कसली असुन तालुक्यातील परिक्षा केंद्रावर भेटी देवून वातावरण ताईट केले आहे.यामुळे काॅफी बदलांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.परिक्षा काॅफी मुक्त होत असल्याने कंधारला लागलेला दाग पुसण्याचे काम उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक व तहसीलदार अणुपसिंह यादव हे करत असल्याचे दिसून येत आहे.
बारावीच्या परीक्षाला दिनांक 21फेब्रुवारी पासुन सुरुवात झाली आहे.कंधार तालुक्यातील 14 सेंटरवर परिक्षा चालु आहेत.परिक्षाच्या सुरवातीलाच उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक यांनी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन काॅफी करणाऱ्यांची गय करु नका असे आदेश देण्यात आले होते.वेगवेगळे पथक स्थापन करुन परिक्षा या काॅफीमुक्त झाल्या पाहिजे या हेतूने ते प्रत्येक परिक्षा केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून हाॅलची पाहणी करत आहेत.दिनांक 1मार्च रोजी
उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी त शेकापुर,कुरुळा येथील परिक्षा केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.या वेळी तहसीलदार अनुपसिंह यादव,तलाठी राजेश बरोडा,राम पांचाळ, मन्मथ थोटे, तलाठी केंद्रे , चालक मिर्झा जबिल बेग व शिक्षण विभागाचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.त्यामुळे परिक्षा केंद्रावर वातावरण ताईट झाले असुन काॅफीविना परिक्षा सुरळीत व पारदर्शक होत आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नांदेड जिल्ह्यातील परिक्षा काॅफीमुक्त करण्याचे प्रयत्न होते. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेचे पालन करत उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक व कंधार तहसिलचे तहसीलदार अनुपसिंह यादव हे आपल्या महसूल यंत्रणा , शिक्षण विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांना सोबत घेऊन परिक्षा कॉपी मुक्त अभियान यशस्वी पणे राबवित आहेत.
कंधार तालुक्यातील शिक्षण प्रेमी यांच्याकडून अशा अधिकाऱ्यांचे अभिनंदन ही होत आहे.