दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा येथे २६ मार्च रोजी बैल बाजार मैदानावर बी आर एस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेला कंधार लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बि.आर.एसचे नांदेड जिल्हा पक्ष निरिक्षक आ. जिवन अण्णा रेड्डी यांनी केले आहे.
पुढे बोलताना आ.रेड्डी म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी विरोधी व उदासीन धोरणामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी व तरुण वर्ग सध्या हैराण झाला आहे. पण तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी व मागासवर्गीय समाजासाठी राबविलेल्या धोरणामुळे तेथील ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे. तेलंगणा राज्यामध्ये शेतीऱ्यांसाठी २४ तास मोफत वीज दिली जाते. तेलंगणातील सर्व शेतकऱ्यांना प्रती वर्षी प्रती एकरी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी तेलंगणा सरकार करू शकते मग महाराष्ट्र राज्य का नाही असा सवाल आ.रेड्डी यांनी केला. तेलंगणा सरकारने आठ वर्षांमध्ये १००० टी.एम.सी. पाणीसाठा केला. शेती माल खरेदीसाठी ७००० खरेदी केंद्र उभारली शेतकऱ्यांना चोवीस तास पैसे देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. नैसर्गिक अपघात व आकस्मित मृत्यूनंतर दहा दिवसात पाच लाख रुपये देण्याचा निर्णयही घेतला. प्रत्येक दलीत कुटुंबांना व्यवसायासाठी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्याची योजना राबवली जाते. कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजनेअंतर्गत मुलीच्या लग्नासाठी १ लक्ष ११६ रुपये ची मदत दिली जाते. अशा अनेक योजना तेलंगणा सरकार राबवते. भारतीय राष्ट्र समितीची नांदेड येथील सभेची धास्ती घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये व दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले तेलंगाना मॉडेल कसे आहे हे येथील जनतेला माहिती होण्याच्या अनुषंगाने या मॉडेलचे जनक भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री मा. के. चंद्रशेखर राव यांची दिनांक २६ मार्च रोजी रविवारी लोहा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला लोहा कंधार तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक आ. जिवन अण्णा रेड्डी यांनी केले आहे.
यावेळी आ. हिमांशू तिवारी, किसान आघाडी अध्यक्ष माणिक अण्णा कदम, दत्ता पवार, जि.प.मा. सभापती संजय पाटील कराळे, दिलीप दादा धोंडगे, डॉ. सुनील धोंडगे, शिवराज पाटील धोंडगे, शिवदास धर्मापुरीकर, प्रल्हाद पाटील फाजगे, छत्रु महाराज, अजय हंकारे, शिवराज मसलगेकर, राजकुमार केकाटे, भास्कर अण्णा आदी उपस्थित होते.