दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): आष्टी व तळेगाव (श्या.पंत) येथे सौंदर्यकरणाच्या नावाखाली व रस्ता सुरक्षा म्हणून तळेगाव- आष्टी- वरुड ३४७ ए या राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेले कठडे २४ तासाच्या आत काढण्यात यावे अन्यथा जनशक्ती संघटनेच्या वतीने लोकहितासाठी नियम तोडून कठडे काढण्यात येईल अशा मागणीचा सज्जड इशारा निवेदनातून स्थानिक जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा मकरंद देशमुख यांच्या नेतृत्वात तळेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता कथलकर व उपकार्यकारी अभियंता पणपालिया यांना निवेदन देत २४ तासाचा अल्टिमेट दिला आहे जनशक्ती संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तळेगाव – आष्टी – वरूड राष्ट्रीय महामार्ग ३४७ ए हा शहरातून जात असल्याने आजूबाजूला रहिवासी क्षेत्र,बँक, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, बसस्थानक, शाळा आहे त्यामुळे विद्यार्थ्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात महामार्गावर वर्दळ असते दररोजची छोटी मोठी हजारो वाहने महामार्गावरून येजा करतात या मार्गाच्या मधोमध असणारे लोखंडी कठडे पाच ते सहा फूट उंचीचे असल्याने लगतच्या रोडवरील वाहने दृष्टीपथास येत नाही त्यामुळे या ठिकाणी दैनंदिन अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे महामार्ग निर्मितीपासून जवळपास ५० च्या वर अपघात झाले असून त्यात १० ते १२ नागरिकांचा नाहक बळी गेला आहे त्यामुळे नागरिकात संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाला वारंवार तक्रारी निवेदन देऊनही महामार्ग प्रशासन जुमानत नसेल तर जनशक्ती संघटनेचे कार्यकर्तेच नागरिकांच्या हितासाठी लोखंडी कठडे काढतील असे निवेदनात म्हटले आहे यावेळी जनशक्ती संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद निंबेकर, न.पं. उपाध्यक्ष जनाब जाकीर हुसेन,सरपंच पेठ अहमदपूर युसुफ शेख, नगरसेवक रामकृष्ण सुरजुसे, रेहान कुरेशी,नासिर शेख, कार्यकर्ते राजेश ठाकरे, योगेश सोनटक्के, अनिरुद्ध दंडाळे, पवन गुल्हाने, चंदू सत्पाळ, विजय गंजीवाले, संजय जाणे, रशीद खा, सोहेल खान, सचिन ढोके, किशोर इंगळे, सादिक खान, वैभव चातूरकर, वैभव मेंढे, संजय एकोतखाने, सचिन गंद्रे, विकी माहोरे, सादिक खा, जावेद बेग, कार्तिक बोंडे, प्रवीण आडे, सतीश राणे हजर होते