दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
सुमारे १२ वर्षापासून टँकरमुक्त असलेल्या म्हसळा तालुक्याला सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून पर्यंतच्या कालावधीत टंचाईची झळ लागते.ही झळ बसणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आमदार आदीती तटकरे यांनी २१ लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे .तालुक्यातील संभाव्य युक्त टंचाईग्रस्त कुडगाव कोंड,खारगाव खुर्द,रोहीणी,खारगाव बु.,
आडी ठाकूर,गायरोणे,खामगाव,गडदाब,आंबेत,सुरई,निगडी, दगडघूम,लेप गौळवाडी,वाघाव बौध्दवाडी,कृष्णनगर नवीवाडी आंबेत,सकलप कोंड,आगरवाडा बौद्धवाडी,आगरवाडा आदीवासी वाडी,खामगाव गौळवाडी,सोनघर,खामगाव मोहल्ला,कासर मलई,जिजामाता हायस्कूल,पेढांबे आदीवासी वाडी,पाभरे बेटकरवाडी,चिचोंडे अशी १५ गावे आणि १२ वाङ्यांचा आराखडयात समावेश आहे.त्यासाठी सुमारे २१लक्ष रुपयांचा निधी मंजुर केलाआहे.यामध्ये नव्याने विंधण विहीरी खोदणे विहीरींची खोली वाढविणे आसा कार्यक्रम रहाणार आहे.तालुक्यात मागील सुमारे चार वर्षांत राष्ट्रीय आणि ग्रामिण पेयजल कार्यक्रम,भारत निर्माण योजना,जल जीवन मिशन अशा विविध योजनाद्वारे ६४ गाव वाङ्यातून सुमारे रु ४१० कोटीचा निधी खासदार सुनिल तटकरे आणि आमदार आदीती तटकरे यानी मंजुर करून आणला आहे.
नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा,अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतां व्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा,पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी,कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील विविध कार्यक्रमांतून नागरिकांची कार्यशाळा घेत असतात.तालुक्यातील अनेक गावाना ३ वर्षांत कोटयावधी रुपयाच्या दोन योजना एकाच गावासाठी राबविण्यात येतात त्याही सदोष होताना दिसत आहेत याबाबत आधिकारी ठेकेदार यांच्या कार्यशाळा घेउन सदोष काम तात्काळ थांबवून ठेकेदार-तांत्रिक आधिकारी यांच्यावर कारवाई होणे जनतेला अपेक्षित आहे.