दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
मी संगीत व नाटक आणि लावणी चा रसिक आहे.म्हणून नृत्य सम्राज्ञी सुरेखा पुणेकर हीचा पुणे मुंबई आणि नांदेड या तीन ठिकाणी तीन वेळा कार्यक्रम पहिला.तिचे सादरीकरण मला फारच आवडले.कारण वैशिष्ट्ये हे की तिची अदाकारी आणि त्यातील भारदस्तपणा .आणि विषशता ही की स्वतःच गाते आणि नृत्य करते.तरी पण अजिबात थकत नाही की परेशानी नसते.हे माझे निरीक्षण एक कुशल प्रेक्षक म्हणून तिच्या कुशल कलेचे परीक्षण .
या कार्यक्रमाला मी सामाजिक आणि राजकीय चस्म्या तून पाहिले असता मला असे दिसले की ; सुरेखा पुणेकर एका गीतावर नृत्य करीत होती ते गीत म्हणजे ” कशी केलीस माझी दैना र मला तुझ्या बिगर करमेना .”
या गाण्याचा अर्थ मी असा लावला.नृतिका म्हणजे लोकशाही आणि प्रेक्षक म्हणजे मतदार .प्रेक्षक पुढे बसलेले आहेत.आणि त्यांच्या पुढे लोकशाही डान्स करते आहे.हे गीत गाते आहे.आणि आणि सुंदर अशी अदाकारी करत अगदी दुःखी कष्टी होऊन अभिनय करीत म्हणते आहे की ” कशी केलीस माझी दैना .” तरी पण तिचे ते दुःख वेदना प्रेक्षकांना अधिकच आनंद देतात.म्हणून ते शिट्ट्या वाजवत असतात.काही जण जागीच तर काही स्टेज समोर येऊन नाचत असतात.आनंद घेत असतात.आणि ही बिचारी मृत्तिका जड अंतःकरणाने दुःखी कष्टी होऊन स्वतः गात नृत्य करीत म्हणत असते .” कशी केलीस माझी दैना “.
तरी पण प्रेक्षकांना तिच्या वेदना चे काहीच वाटत नाही.तिच्या दुःखात हे स्वतःचे सुख घेत असतात.नव्हे खरे सुख तर मिळतच नाही .पण कृत्रिम सुखात आनंद मानतात.एक विरंगुळा म्हणून.कारण हे प्रेक्षक पण संसार व्यवहार चे ओझे घेऊन जीवन जगत असतात.ते ओझे पेलवत नाही म्हणून दारू गांजा चे व्यसन करतात.छंद फंदात विरुंगला मानतात.प्रेक्षक हे व्यसनाधीन असतात म्हणून त्या दृतिकेच्या दुःखाचे वेदनेचे त्यांना काहीच देणे घेणे नसते.पण वस्तुस्थिती पाहता नृतीका आणि प्रेक्षक हे दोन्हीही दुखीच असतात.म्हणजे समदुखी असतात.विरंगुळा म्हणून थोड्या.वेळासाठी का होईना आनंद घेण्यासाठी एकत्र येतात.कारण नेहमीसाठी च या व्यवस्थेने यांच्या पदरी दुःखाचा डोंगरच टाकला आहे.
दुःखी लोकशाही आहे.( डान्सर) आणि मतदार ( प्रक्षक ) पण आहेत.आणि हे दोन समदुःखी तात्पुरता आनंद घेताहेत.पण हे दोघेही या कृत्रिम आनंदा ऐवजी किंवा तात्पुरत्या आनंद ऐवजी खराखुरा कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल ? यावर विचार करीत नाहीत.हे यांचे अज्ञान आहे. आपल्यावर हे कृत्रिम नकली जीवन जगण्याची वेळ का आली ? याची कारणे काय ,? आणि त्यावर उपाय काय ,? यावर विचार केला पाहिजे.ही प्रक्रिया होताना दिसत नाही.आणि या शिवाय तर पर्या नाही.कारण पिढ्यान् पिढ्या लोकशाही आणि मतदार किती दिवस दुःखात राहणार ,? हाच तर खरा प्रस्न आहे .
लोकशाहीने मतदारास स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षानंतर हा प्रस्न विचारावा की कशी केलीस माझी दैना ? आणि लगेच म्हणावे की ” मला तुझ्या बिगर करमेना .” याचा अर्थ मतदार आणि लोकशाहीचे नाते इतके घट्ट आहे की ; मतदाराने तिची कितीही दैना केली तरी ती म्हणते ” मला तुझ्या बिगर करमेना “. आणि मतदाराला तिच्या शिवाय करमेना.कारण यास स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय हवा आहे.आणि या गोष्टी लोकशाही शिवाय मिळत नाहीत.लोकशाही तर आहे.पण ती दुःखी कष्टी आहे.तिच्या वेदना मतदार समजून घ्यायला.तयार नाही.कारण त्याला व्यसन जडले आहे पैश्याचे दारूचे मटणाचे जातीचे धर्माचे घराणेशाही चे नातेवाईकांचे .या मुळे लोकशाही धोक्यात आली आहे.ती दुःखी कष्टी अंतःकरणाने गाण्यातून नृत्यातून मतदारास सांगते आहे की आता हे व्यसन सोड .भानावर ये.तू शुद्ध हो अन् मला पण शुद्ध कर.आपण दोघेही अपवित्र झाला आहोत.मत हे अमूल्य आणि शुद्ध आणि पवित्र आहे.कारण मत म्हणजे एखादी वस्तू नव्हे की जिला किंमत असते तिची देवाण घेवाण करता येते.) तर मत म्हणजे वस्तू नसून दान आहे. दाना मधे शुद्धता पवित्रता नीतिमत्ता असते.दान हे दारूला मटणाला पैसा ला विकायचे नसते.ते खरेदी विक्रीचे साधन नव्हे.हे जेंव्हा मतदारास कळेल तेंव्हा मतदार जागृत झाला असे म्हणावे लागेल .नाही तर अडाणी आई घर वया जायी असेच होणार.
मतदार आणि लोकशाही यांचे नाते नवरा बायकोचे आहे.पत्नी ही क्षणिक सुखाची असली तरी अनंत काळाची माता आहे.असे संत तुकाराम म्हणाले.ते अजूनही समजले नाही.नवरा दारुडा निघाला तर त्यास सोडता येत नाही.पण त्यामुळे घराचे घरपण जाते.तिला घर नीट ठेवता येत नाही.घर कुटुंब नीट नसेल तर घरात सुख शांती आनंद समाधान मिळणार नाही.
या साठी मतदाराची पत्नी म्हणजे लोकशाही लक्ष्मी.तिचा विचार व्हावा.नाहीतर मरणास तय्यार व्हावे .
लेखक : दत्ता तुम वाड .अध्यक्ष सत्यशोधक समाज नांदेड .९४२०९१२२०९ .