दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी:-माधव गोटमवाड
कंधार परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने व थंडीच नसल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकरी वर्ग पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाच्या अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागली असून फवारणी खर्च वाढला असल्याचे दिसून येत आहे.
कंधार परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने रब्बी हंगामातील सगळ्यात जास्त गहू ,हरबरा या पिकाला धोका होणार आहे. वातावरणाच्या बदलामुळे तुरी पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचबरोबर हरभरा या पिकाला मर हा रोग लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फवारणी खर्चाचा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यावर्षी खरीप पिकातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शासनाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही या वर्षी रब्बी हंगामासाठी शेतकर्यांना पुन्हा कर्जाचा बोजा डोक्यावर उचलावा लागला. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी गहू ,हरभरा, ऊस ,केळी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. खरीप हंगामातील कसर रब्बी हंगामात काढू असे सांगून शेतकरी दुप्पट मेहनत करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच ढगाळ वातावरण आहे .यामुळे पेरणी दिवसेंदिवस लांबली जात आहे. दोन चार दिवसात ढगाळ वातावरण जाईल असे सांगून शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची पेरणी केली. परंतु हरभरा पिकाला ढगाळ वातावरणामुळे मर लागत असल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फवारणी खर्च वाढला असून शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना फवारणी करत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान भेटले नाही,शेतकऱ्यांना पीक विमा खूप कमी प्रमानात मिळाला तर काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही.तसेच काही शेतकऱ्यांना पीक कर्ज सुद्धा भेटले नाही ,शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.शासकीय अनुदान प्रशासनाने शेतकऱ्यांनच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.