दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी – शिवराज पाटील
शिवसेना – भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे सरकारी कार्यालयातील शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत त्यांची कामे जलदगतीने व्हावीत, या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. सोमवार दि.१२ रोजी उमरगा येथे या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ केला.
शासन आपल्या दारी’ हा एक क्रांतिकारी उपक्रम असून, आतापर्यंत नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ किंवा दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात फेर्या माराव्या लागायच्या, मात्र आता शासन लोकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच प्रशासनाने एकही लाभार्थी वंचित राहू नये याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी केल्या.
कार्यक्रमात नागरिकांकरिता संजय गांधी योजना, महिला बालविकास विभाग, रेशनिंग, समाज विकास योजना, रेशनकार्ड शिधापत्रिका विभाग यांसारखे विविध स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना योजनांची योग्य माहिती, फायदे तसेच प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजली. या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला, तहसिल कार्यालय – 335, महिला व बालकल्याण विभाग – 106, पशुसंवर्धन विभाग – 57, महिला आर्थिक विकास महामंडळ – 6, नगर परिषद, उमरगा – 197, नगर परिषद मुरूम – 137, कृषी व पंचायत समिती विभाग – 335, आरोग्य विभाग – 147, सामाजिक वनीकरण – 10, उमेद – 211 बचत गट, महावितरण – 45, याप्रमाणे एकूण सुमारे 1586 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गणेश पवार, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, माजी बांधकाम सभापती अभय चालुक्य, तहसीलदार गोविंद येरमे, तालुका कृषी अधिकारी सागर बावसकर, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, वैद्यकीय अधीक्षक विनोद जाधव, महावितरणचे उपअभियंता आर.एम.शेंडेकर, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शिवसेना – भाजप पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नागरिकांकरिता संजय गांधी योजना, महिला बालविकास विभाग, रेशनिंग, समाज विकास योजना, रेशनकार्ड शिधापत्रिका विभाग यांसारखे विविध स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना योजनांची योग्य माहिती, फायदे तसेच प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजली. शासन आपल्या दारी’ हा एक क्रांतिकारी उपक्रम असून, आतापर्यंत नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ किंवा दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात फेर्या माराव्या लागायच्या, मात्र आता शासन लोकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. या अंतर्गत उपस्थित सर्व नागरिकांना शासनाच्या लाभदायी योजनांबद्दल मार्गदर्शन करून, शासकीय दाखले देण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.