गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : पेरणीचा कालावधी संपत येण्याच्या मार्गावर असताना अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. अर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी बॅक , बचत गट , सावकारी व उसनेवारी कर्ज काढून दोन महिन्यांपासून तयारी केली आहे. परंतु ऐन पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस पडताच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पेरणी झाल्यानंतर काही दिवस पाणी न पडल्याने काही बी बियाणे जमिनीमध्येच करपले तर , मागील काही दिवसांपासून संततधार मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याने त्या पावसामध्ये पिकावर रोगराई पसरल्याने कापुस सोयाबीन उडीद मुग हि पिके लोहा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी करपायला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांना हिरावा बहार येण्यासाठी फवारणीला सुरूवात केली. बळीराजाच्या पावसाळ्याच्या प्रतिक्षेत असल्याची चिन्हे दिसुन येत आहेत.
दरवर्षीपेक्षा या वर्षी बळीराजाच्यावर निर्सगाची अवकृपा तर दिसून येतेच पण महाराष्ट्र राज्याचा सत्तासंघर्ष पाहता सरकारची पण शेतकऱ्यांवर म्हणजे खते , बि – बियाणे किटकनाशके , यात लक्षणीय वाढ तर शेतकऱ्यांचा शेतीमाल माल कवडीमोलाने खरेदी करत असल्याने शेतकरी बांधवांनामध्ये नाराजीचा सुर कायम असल्याची चिन्हे दिसुन येत आहेत.