दै.चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी, पीक विमा मंजूर करण्यात यावे, पीक कर्ज माफ करा, पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील सर्व पात्र शेतकऱ्यांना त्वरित निधी मंजूर करण्यात यावे, निराधार, वृद्ध, अपंग, वृद्धापकाळ योजना श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानात वाढ करण्यात यावी, अतिवृष्टीग्रस्त भागातील जनतेसाठी राशन कार्ड धारकांना ५० किलो धान्य मोफत देण्यात यावे आदी मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजता नांदेड हैद्राबाद हायवेवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी विधानसभा मतदारसंघसंपर्कप्रमुख संदीप महीदा,
उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, महेश पाटील, जिल्हा संघटक विजय मुंडकर, बिलोली तालुका प्रमुख शिवकुमार बामणे सगरोळीकर, देगलूर तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे, विधानसभा मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे, जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर, शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, भागवत पाटील, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, उपशहरप्रमुख संजय जोशी, बाबुराव मिनकीकर, सुधाकर उल्लेवार, शहर प्रमुख रवी उल्लेवार, पांडुरंग थडके, जेजेराव पाटील, डॉ. सुनिल जाधव, विनोद सोनकांबळे, पुरुषोत्तम अन्सापुरे, संतोष कांबळे, दिलीप इनामदार, राजु उल्लेवार, गंगाधर पाटील चाकूरकर आदी उपस्थित होते.