माजी खा.खतगावकरांचे दिपकभाऊ रामपूरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर : १९७५ साली मी राजकारणात आलो.तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यानंतर मी आ.खासदार झालो.कारण माझे राजकीय गुरु स्वर्गीय शंकरराव चव्हाण होते.त्यामुळे तात्पर्य एवढंच सांगायचे की, कुठल्याही पक्षात जाययाचे असेलतर त्या पक्षातील नेत्यावर श्रेद्ध अन् निष्ठा ठेवून राजकीय गुरु करा.आणि आमच्या काँग्रेस पक्षात ह्याचे असलेतर दिपक रामपूरकर तुम्हाला अगोदर ना.अशोकराव चव्हाणांना गुरू करावे लागेल. असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकरांनी देगलूर येथील सिद्धेश्वर मंगलकार्यात दिपक रामपूरकर यांच्या आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन केले.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पा. खतगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर भिलवंडे, शिवसेनेचे महेश पाटील,तालुका प्रमुख बालाजी इंगळे,रवी पाटील खतगावकर, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर,भीमराव जेठे,पिंटू पाटील,माधवदादा वाघमारे, माधव कंधारे,रायुकॉ तालुकाध्यक्ष गजनान पा. होटाळकर,सचिव श्याम चौडे, राष्ट्रवादीचे रमेश शिवणीकर,संभाजी बिग्रेट जेजेराव पाटील,मराठासंघाचे गजानन मुजळेकर,अँड वीरेंद्र पाटील,नंदू पाटील रातोळीकर बालाजी शिंदे,रमाकांत सुर्यवंशी, माधव बेंद्रीकर,आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.तसेच देगलूरचे भूमिपुत्र दिपक रामपूरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास महाविकास आघाडीच्या दिगग्ज लोकप्रतिनिधी उपस्थिती होती.तर राष्ट्रवादीचे भास्कर भिलवंडे यांचे भाषण लक्षवेधी ठरले तसेच युवाकीर्तनाकार सुप्रसिद्ध हभप चैतन्य महाराज वाडेकर आळंदी पुणे यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रमला भक्तांने अलोट गर्दी केली होती.
पुढे बोलताना माजी खा.भास्करराव पा. खतगावकर यांनी दिपक रामपूरकरांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात व्यासपीठावर विविध पक्ष्याचे लोकप्रतिनिधी याच्या उपस्थितीत चांगलीच राजकीय जुगलबंदी घडवून आणली ते म्हणाले आ.अमर राजूरकर,यांच्या समाजाची लोकसंख्या अधिक नसतांना आणि डी.पी.सावंत हे कोकण येथील रहिवासी असतांना या दोघांनाही प्रामाणिकपणे श्रेद्ध आणि निष्ठा ठेवून गुरुवर्य ना.अशोकराव चव्हाण यांच्यासोबत एका निष्टेने अहोरात्र काम केल्याने या दोघांनाही ना.चव्हाणांनी आमदार केले.
त्यामुळे दिपक रामपूरकर तुम्ही ही राजकारणात प्रवेश करीत असताना आपली विचार सरणी पाहिजे की आपल्याला कुठल्याही पक्षात जाययाचे हे अगोदर ठरवा.काँग्रेस मध्ये आला तर तुम्हाला पक्षाचे तिकीट दयाचे की,नाही हे ना.अशोकराव चव्हाणांचा ठरविणार आहेत. त्यामुळे दिपक कांबळे तुम्ही ना.अशोकराव चव्हाणांना गुरु करा बाकी मी पाहतो असे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकरांनी आवर्जुन सांगितले.
देगलूर तालुक्यातील प्रश्न काय आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी काय केले पाहिजे याचे प्लॅनिंग नियोजित असले पाहिजे आज मी तुम्हाला सांगतो बिलोली- देगलूर तालुक्यात जेवढे गाव आहेत. त्याचा आराखडा माझ्या जवळ आहे.मी आज ही आमदार खासदार असतांना बऱ्या पैकी कुठला रोड पाहिजे, कुठला कॅनल झाला पाहिजे,कोणत्या ठिकाणाच्या जागेवार बाजारपेठ झाली पाहिजेत. शेतकऱ्याचे प्रश्न,बेरोजगारांचे प्रश्न आहेत.याची जाणीव स्थानिक आमदार खासदारांनी ठेवली पाहिजेत नाहीतर सत्तेची नशा कशी उतरवायची हे मतदार राजाला माहित आहे.असे रोखठोक भूमिका माजी खा.भास्करराव पाटील यांनी दिपक रामपूरकरांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास आलेल्या विविध पक्षाच्या व्यासपीठावर चौफेर जुगलबंदी केली.
*चौकट*
*माजी खा.खतगावकारांची अभिष्टचिंतन सोहळ्याची उपस्थित मी अविष्यात विसरणार नाही*
*-दिपक रामपूरकर*
माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी जिल्ह्याचे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी उपस्थिती लावल्याने मी उभ्या अविष्यात हा प्रसंग विसरणार नसून जिल्हातील महाविकास आघाडीचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी वेळेतलं वेळ काढून आल्याबद्दल सर्व मान्यवरांचा मी ऋणी असून दादा आपण राज्याची व जिल्ह्याची सध्याची राजकीय परिस्थिती सांगितले सद्याचे राजकारण काय आहे. पुढची वाटचाल काय करायची सध्या काय चाललय तुम्ही रीतसर मार्गदर्शन केलात.त्या अनुषंगाने सांगतो की,मराठवाड्याचे जलनायक व भाग्यविधाते कै.शंकरराव चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्हाचा जलमय विकास केला म्हणून मी गेल्या १५ वर्षांपासून शेतकऱ्यांचे कैवारी आणि माझे गुरुवर्य कै शंकरराव चव्हाणांना मी म्हणतो.त्याच धर्तीवर यापुढे माझी राजकीय वाटचाल सुरू राहील असा आशावाद देगलूरचे भूमिपुत्र दिपकभाऊ रामपूरकरांनी व्यक्त केला.
माजी खा.खतगावकरांनी ठरवलं तर काही होऊ शकते
भास्कर भिलवंडे
नांदेड जिल्ह्याचे माजी खा.भास्कर पाटील खतगावकर यांच्या हाताला हात धरून माझी वडील कै भगवानराव पाटील भिलवंडे यांनी उभ्या अविष्यात दादांच्या नेतृत्वाखाली काम केल्याने माझ्या वडिलांनी माझे नाव भास्कर ठेवले असून देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या बालकिल्यात खतगावकर दादाने ठरवलं त्याचं आतापर्यंत येथील मतदारांनी केले आहे.त्यामुळे दिपक रामपूरकर यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा असे मत व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा राष्ट्रवादीचे भास्कर भिलवंडे यांनी दिल्या.