@ १२ आक्टोंबर २०२३..…
जालना जिल्हा शासन प्रशासनाच्या कार्यालयाचे दार उघडा..
अन् शेतकरी कष्टकरी कामगारांवरील अन्याय दूर करा., जालना जिल्हा परिषद पंचायत समितीवर शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे स्ट्रिंग ऑपरेशन…
जालना प्रतिनिधी आकाश माने
महाराष्ट्र सरकार जालना जिल्ह्यातील सरकारी कार्यालयाचे सतत बंद असलेले दार उघडा, शरद जोशी विचारमंंच शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष राहुल घोडके पाटील यांचे शिंदे फडणवीस अजित पवार प्रशासनाला दार उघड व हे दार उघड चे आव्हान…
अन्यथा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांचे खंबीर नेतृत्वाखाली जालना जिल्हा परिषद पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयावर पुन्हा शेतकरी किसान मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने जालना जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे…
*त्या संदर्भात आंदोलनाचा इशारा शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांचे नेतृत्वाखाली विराट शेतकरी मोर्चा काढून असा इशारा मराठवाडा विभागाचे संघटनेचे अध्यक्ष राहुल घोडके पाटील यांनी जालना प्रशासनाला दिलेली असून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जालना शासन प्रशासनामधील बेशिस्त अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत सोमवार ते शुक्रवार रेगूलर काम करावे, शेतकरी कष्टकरी कामगार यांना त्रास देऊ नये बाबत जिल्हाधिकारी जालना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेला आहे…
जालना जिल्हा प्रशासन यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ समज देऊन सोमवार ते शुक्रवार नागरिकाची सनद , कर्तव्यात कसूर करू नये आणि दप्तर दिरंगाई करु नये, नागरिकाची सनद कायद्याचे तंतोतंत पालन करून स्वताचे नौकरी कार्य प्रामाणिक पुणे करावे व शेतकऱ्यांना वेळेत न्याय द्यावा…
अन्यथा शेतकरी कष्टकरी कामगार यांना वेळेतच न्याय न मिळाल्यास संबंधितांवर सक्षम न्यायालयात दाद मागत कठोर कारवाई करण्याचा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी यावेळी पत्रकारांशी भ्रमणध्वनी वरून दिलेल्या मुलाखतीत जालना प्रशासनाला दिला आहे…
अशी माहिती संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष योगेश कदम पाटील व सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रदीप दिव्य वीर यांनी दिली आहे, यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी व शेतकरी उपस्थित..