दैनिक चालु वार्ता,
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे(इंदापूर): दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील आठवड्यात चालू होणार असून या परीक्षांच्या काळात विजपुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना इंदापूर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी निमगाव केतकी येथील कनिष्ठ अभियंता, समीर निगडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून निमगाव केतकी आणि परिसरात सुरळित वीज पुरवठा होत नाही त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. असं असताना बारावीच्या मुलांची परीक्षा पुढील आठवड्यात सुरु होत आहे. दहावीच्या मुलांची परीक्षाही लवकरच सुरु होत आहेत. आपल्याकडे सुरळित वीज पुरवठा होत नाही सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे सध्या परीक्षांचे दिवस आहेत रात्री अचानकपणे वारंवार वीज खंडीत होत आहे, वीज गेली तर तासंतास येत नाही अशावेळी आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवरील दहावी-बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो,त्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असते. वर्षभर कितीही अभ्यास केला असला तरी परीक्षाला जाण्यागोदर त्या अभ्यासाची उजळणी झाली तरच त्या अभ्यासाच्या परीक्षेला उपयोग आहे. अशा परीक्षेच्या काळात सलग आणि सुरळीत वीजपुरवठा झाला तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आलं.यावेळी विद्यार्थी सेनेचे राजू भोंग, मनोज हेगडे, किरण भोंग, सौरभ डोंगरे, स्वागत भोंग, शशी भोंग, अंबादास जगतात, किरण डोंगरे, गौरव भोंग, महेश भोंग, ओंकार शेंडे, प्रतिक मिरगणे, महेश भोंग, रोहित भोंग, तुषार भोंग, मनोज जंगम, विशाल भोंग उपस्थित होते.