दै.चालू वार्ता,
विष्णुपुरी सर्कल द.नांदेड प्रतिनिधी,
बालाजी पाटील गायकवाड
पावडेवाडी नांदेड दि:15/10/2021
कोरोणच्या सर्व नियमांचे पालन करून आज १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त देशभर “वाचन प्रेरणा दिन” साजरा केला जातो त्या अनुषंगानेच *गुरुकुल पब्लिक स्कूल* मध्येही हा वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.पण हा दिवस फक्त तेवढय़ाच दिवसापुरता मर्यादित राहायला नको याचाही विचार व्हायला हवा.दिवंगत राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम नेहमीच म्हणत,‘पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंदही मिळाला आहे.ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे.युवक वाचतील तर देश वाचेल अशी त्यांची खात्री होती.”वाचाल तर वाचाल”असं आपण नेहमीच म्हणतो,पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे. अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून १५ आक्टोबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिवस”म्हणून साजरा केला जातो.मुलांना वाचनामध्ये गोडी निर्माण व्हावी,वाचनाचे महत्त्व समजावे, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, ती निर्माण व्हावी हाच वाचक प्रेरणा दिनाचा उद्देश आहे.अभ्यास एक अभ्यास न राहाता अवांतर वाचनही आवश्यक आहे.त्याचे अनेक फायदेही आहेत.अवांतर वाचनाने अनेक संदर्भ मिळतात.आकलनशक्ती वाढते.व्यक्तिगत विकास तर होतोच.पण वाचन प्रेरणा दिनाचे निमित्ताने शाळेत डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे वाचन व्हावे.एक वाचनकट्टा त्यासाठी निर्माण व्हावा त्यात सगळ्या विद्यार्थी-शिक्षकांचा सहभाग असावा.सामाजिक स्तरावरही याचा प्रसार करून या वाचनकट्टय़ासाठी पुस्तके गोळा करावी आणि शाळा शाळामध्ये पुस्तक पेढी तयार करावी.डॉ.कलाम यांना आदरांजली म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. शिक्षकांनीही कलाम यांच्या पुस्तकाचे वाचन करावे. डॉ.कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारदृष्टी,प्रेरणा देण्याची कार्य करतील,माजी विद्यार्थ्यांनी,पालकांनी शाळेतील या वाचनकट्टय़ाला एक पुस्तक किंवा शक्य तेवढी पुस्तके भेट द्यावीत.
शाळांमधून विद्यार्थ्यांना एक तास मुक्तपणे वाचन करण्याचा आनंद मिळावा म्हणून ठेवावा.त्यांना त्या तासाला पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.पुस्तके प्रेरणा तर देतातच,पण महत्त्वाचे म्हणजे ते ज्ञानाचे स्रोत आहे.वाचनात अनेकविध गुण आहेत.शब्दसंग्रह समृद्ध तर होतोच,पण ज्ञानाची कक्षाही रुंदावते.मनोरंजन हा भाग तर आहेच.शाळा शाळांतून चांगल्या पुस्तकांचे चर्चासत्रांचं आयोजन करणे, एखाद्या पुस्तकावर व्याख्यान,लेखक,कवींना आमंत्रित करून त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणणे,मुलांना बोलते करणे.पुस्तकांचे प्रदर्शन अशा प्रकारांनी कार्यक्रम केले जावेत.महान व्यक्तींच्या जीवनात वाचनाचा पडलेला प्रभाव या विषयावरचे व्याखानही आयोजित केले जाऊ शकते.एखाद्या पुस्तकावर विद्यार्थ्यांमध्येही चर्चा घडवून आणली जाऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेटच्या मोह जाळामुळे वाचन कमी होतंय का? वाचन संस्कृती हरवत चालली आहे का?हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. त्याचे उत्तर काही अंशी होय असे आहे.आज ई-बुकचे वाचन मुले करतात असा दावा केला जातो,पण तो काही खरा नाही.एक-पाच दहा टक्के मुलेही ते वाचत नसावे.हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद निराळाच असतो.
हा एक दिवस साजरा करून वर्षभर स्वस्थ बसणे आणि पुढच्याच वर्षी परत एक दिवसाचा”वाचन प्रेरणा दिन”साजरा करणे हे उद्दिष्टे असू नये.केवळ शिक्षण विभागाचा फतवा येतो म्हणूनच उपचार नसावा. दरवर्षी कार्यक्रमाच्या बातम्या तर खूप वाचतो.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सातत्याने प्रयोग आणि प्रयत्नांची गरज आहे.डॉ.कलाम म्हणतात, ‘विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांमध्ये ही उच्च गुणांची गरज आहे.तो ज्ञानाने संपन्न असावा.विद्यार्थ्यांशी आपुलकी असावी. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असावा.केवळ पुस्तकी ज्ञान,शिक्षण देणे एवढेच न करता मुलांची मने उच्च ध्येयाने प्रज्वलित केली पाहिजे’.
विद्यार्थ्यांना टी.व्ही,स्मार्ट फोन,कॉम्प्युटर यापासून दूर करून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे हाच या दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
अनेक शाळांमधून ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहाने साजरा केला पण हा दिवस फक्त तेवढय़ाच दिवसापुरता मर्यादित राहायला नको याचाही विचार व्हायला हवा.
दिवंगत राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम नेहमी म्हणत,या देशातील युवक वाचता झाला तरच हा देश वाचेल अशी त्यांची खात्री होती.”वाचाल तर वाचाल”असं आपण नेहमीच म्हणतो,पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.