दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
माजलगाव, (प्रतिनिधी):- प्रत्येक अडचणींवर मात करत लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना एकही हंगाम बंद न ठेवता अविरतपणे ऊसाचे गाळप करत असल्याचे चेअरमन धैर्यशिल (काका) सोळंके यांनी सांगितले. तर निसर्गाचा लहरीपणा रोखण्यासाठी झाडे लावा आणि पर्यावरणाचा समतोल राखावा असे आवाहन हवामान तज्ञ पंजाब डक यांनी केले.
माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा ३० वा गळीत हंगाम शुभारंभ आज दुपारी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर, आ. प्रकाश
दादा सोळंके, चेअरमन धैर्यशिल सोळंके, हवामान तज्ञ पंजाब डख, अशोक डक, बाबुराव पोटभरे, जयसिंह सोळंके, संभाजी शेजुळ, कल्याण आबुज आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक चेअरमन धैर्यशिल सोळंके यांनी केले. ते म्हणाले, गत २९ वर्षापासुन अविरतपणे ऊस गळीत हंगामासाठी पुर्ण यंत्रणा सज्ज आहे. या हंगामासाठी १२. .00 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ते पुर्ण करण्याचा प्रयत्न कारखाना आणि येथील प्रत्येक कर्मचारी करणार आहे. या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास परिसरातील सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वहातुक ठेकेदार यांच्यासह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.