दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सेलू–
पहिला पाऊस मनाला आनंद देतो पण काही ठिकाणी पावसाळा आला की सगळ्यांची तारांबळ उडते. पावसाळ्यात सेलू येथील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नाला गल्ली येथे पाणी घरात शिरू पाहते.अशामध्ये या प्रश्नाचे निराकरण होणे जरुरीचे आहे.परंतु त्याकडे नपा चे साफ दुर्लक्ष होत आहे.सेलु मध्ये घानीचे साम्राज्य पसरत असताना स्वच्छतेचा प्रश्न एरनिवर येताना दिसत आहे.अद्याप कुठेही याबाबत नप द्वारे गांभीर्याने नियोजपूर्वक कार्यक्रम हाती घेतलेला दिसत नाहीये. दैनदिन कामे तसेच पावसाळ्यापूर्वी करायच्या कामाबाबत स्थानिक कर्मचारी तसेच प्रशासक उदासीन दिसत आहेत. दरवर्षप्रमाणेच यावेळी देखील जनतेच्या प्रश्नाबाबत थातूरमातूर काम करून नप वेळ मारून नेणार का?असा प्रश्न सेलुतील नागरिकांना पडू पाहत आहे.नप ने वेळेत सर्व कामे पूर्ण करावीत अन्यथा नागरिकांच्या मदतीने मोर्चा काढून नप मध्ये कचरा टाकून निषेध व्यक्त केला जाईल तसेच सामाजिक संस्थाकडून आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा येथील मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभिजित राजूरकर यांनी दिला आहे.