दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे नवीन दस्तऐवज नसून ते एक “ज्ञान दस्तऐवज” आहे, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज पुण्यात व्यक्त केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित गोलमेज परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्रालय अतिरिक्त सचिव राकेश रंजन, सिंबायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां .ब. मुजुमदार, प्रधान संचालक डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते.
प्रधान म्हणाले, “सर्वांनी आखलेले नवे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. देशातीलकेंद्र सरकार शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक विकासासाठी कटिबद्ध आहे. आज आपल्या देशाला बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धतीची गरज आहे. पुण्याचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.
शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, ग्लोबल सिटिझन या संकल्पनांची सुरुवात पुण्यातून झाली. या संकल्पना डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या मनात होत्या