दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : कोरोना रुग्णांचा आकडा देशात वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात ही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यामूळे केंद्र आणि राज्य शासनाने याबाबत खबरदारी घेत मास्क वापर अनिवार्य सारख्या नियमांची अंमलबजाणी करणारे निर्णय राज्य शासन करत आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याने या बैठकीत चर्चा झाली. गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84. % ची वाढ झाली आहे.