दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनिधी: दशरथ आंबेकर
यावर्षी मान्सून आठ ते दहा जूनला महाराष्ट्रात धडकणार असा हवामान वेधशाळेने अंदाज वर्तविला असून शेतकऱ्यांनी खते,बी-बियाणे यांची जुळवाजुळव करून ठेवण्याची लगबग सुरू केली आहे.यातच मराठवाडा,विदर्भ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बी-बियाण्यासाठी तेलंगणामधीलआदिलाबाद,निर्मल म्हैसा कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी केली आहे.यावरून मराठवाडा,विदर्भ परीसरातून तेलंगणातील कपाशीच्या बियाण्यांना मागणी वाढल्याचे चित्र पहावयास मिळतआहे.संपूर्ण शेतकऱ्यांची एकच इच्छा असते की, उच्च प्रतीचे आणि चांगल्या दर्जाचे अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करून बी-बियाणे जपवणुक करून ठेवणे.म्हणूनच संबंध मराठवाडा,विदर्भसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी तेलंगणातील जिल्ह्यातील ठिकाण असलेल्या आदीलाबाद,निर्मल,म्हैसा ठिकाणच्या कृषि सेवा केंद्रातील बाजारात बियाणे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे.यामुळे मराठवाड्यातील तर आपण किनवट कृषी सेवा केंद्र चालक यावरील शेतकऱ्यांचा विश्वास कमी झाला की काय?असा प्रश्न यावेळी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.तर काही ठिकाणी दुकानादार बियाणे हे चढत्याभावाने विक्री करतअसून यामुळे शेतकरी चांगले प्रतीचे बी बियाणे ही मिळत नाहीतआणिभावात तफावत असल्या कारणाने काही शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यातील बियाणे उत्तम आणि चांगल्या दर्जाचे प्रतीचे असतात,उगवण क्षमता चांगली राहते.तर उत्पादनात चांगली वाढ होत आहे, असे स्पष्ट सांगितले जात आहे.म्हणूनच मराठवाडा,विदर्भ व महाराष्ट्राच्या सीमावर्ती ग्रामीण भागातील काही शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी तेलंगणातील बाजारात जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. किनवट तालुक्यातील कृषी दुकानदार चालकांनी आता तेलंगणा राज्यातील बी-बियाणे व भावात सुद्धा सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण असाच कल वाढत राहिला तर सर्व शेतकरी तेलंगणा राज्यातूनच बी बियाणेआणतील,याबाबींचा विचार करणे गरजेचे बनलेआहे.