दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधि- मोहन आखाडे
औरंगाबाद : आज शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीका केली आहे. या सोबतच मुख्यमंत्र्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना देखील त्यांचे नाव न घेता टोला लगावाला.
हिंदूत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा, असा टोला त्यांनी राणा दाम्पत्याचे नाव न घेता त्यांनी लगावला. ते म्हणाले की, उगाच कुठेतरी जाऊन दुधाचा अभिषेक करताय, हिंमत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन काश्मीरी पंडितांची रक्षा करा, नामर्दांच हिंदूत्व आम्हाला शिकवू नका, मर्द असाल तर काश्मीरमध्ये जाऊन त्यांची रक्षा करा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला दिला आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही.. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. भाजप प्रवक्त्यांनी प्रेषितांचा आपमान करण्याचा संबंध काय? आपल्या देवी-देवतांचा अपमान करायचा नाही तसं त्यांच्याही देवतांचा अपमान करायचा नाही, असे त्यांनी यावेळी सांगितलं.