दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी नुकतीच नाराजी व्यक्ती केली होती. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीला मतदान करते किंवा नाही, याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर चिंतेत पडलेल्या मविआच्या नेत्यांनी मतांची भीक आपल्या झोळीत पाडण्यासाठी नमाज पडण्याचा कार्यक’म चालवला असल्याचे कळते. त्यासाठी पत्र पाठविणार असल्याची चर्चा आहे.शिवसेनेचा अहंकार आणि भाजपाने खेळलेला डाव यामुळे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तिनही पक्षांचे मंत्री, प्रदेशाध्यक्ष अशा सार्यांचीच धावपळ होत असून, छोट्याछोट्या पक्षांच्या आणि अपक्षांच्या पायघड्या घालाव्या लागत असल्याने त्यांची चांगलीच दमछाक उडताना दिसत आहे.
निमित्त आहे शिवसेनेने आपल्या अहंकारापोटी लादलेल्या राज्यसभा निवडणुकीचे. भाजपाने सहाव्या जागेसाठी आपला तिसरा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी चुरस निर्माण झाली. शिवाय अडगळीत पडलेले छोटे पक्ष व अपक्ष यांचा भाव प्रचंड वधारला गेला. 16 छोटे पक्ष आणि 13 अपक्ष असा भला मोठा 39 चा आकडा यांचा असून, आता खर्या अर्थाने बड्या राजकीय पक्षांच्या नाड्या त्यांच्या हाती आहेत. यातील जास्तीत जास्त मते ज्या पक्षाच्या वाट्याला येईल, त्या पक्षाच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर हेाणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने अपक्ष व छोट्या पक्षांची मनधरणी करणे सुरू असले तरी, यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच दमछाक उडत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात सपाची दोन मते आहेत. या पक्षाचे महाराष्ट्रात नेतृत्व अबू आझमी करतात. ते महाविकास आघाडीवर चांगलेच नाराज असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपली नाराजी आणि मागण्या याबाबतचे भले मोठे पत्र लिहिले. पत्राचे उत्तर आल्यानंतर मतदान कोणाला करायचे, हे आम्ही ठरवू, असा त्यांचा पवित्रा आहे.. आझमींची मनधरणी करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडीच्या नेत्यांनी आता त्यांना डावलून थेट अखिलेश यादवांना गळ घालायचा प्रयत्न चालवला असल्याचे वृत्त आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठविल्याचे कळते.
भाजपा आणि शिवसेनेचे नेते बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना दोन दिवसांपूर्वी भेटले होते. ठाकूर यांनी आपला निर्णय 10 तारखेला घेऊ, असे जाहीर केले. मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला आघाडीत सहकारी पक्ष असलेल्या बविआला निमंत्रणच दिले नाही. त्यामुळे आधीच नाराज असलेले ठाकूर अजून संतापले. आता ही नाराजी दूर करण्यासाठी आघाडीचे प्रमुख शरद पवार दूरध्वनीद्वारे हितेंद्र ठाकूरांना पायघड्या घालत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी नुकतीच नाराजी व्यक्ती केली होती. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीला मतदान करते किंवा नाही, याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर चिंतेत पडलेल्या मविआच्या नेत्यांनी मतांची भीक आपल्या झोळीत पाडण्यासाठी नमाज पडण्याचा कार्यक’म चालवला असल्याचे कळते. त्यासाठी पत्र पाठविणार असल्याची चर्चा आहे.