
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवी सरकार इंगळी
कै,बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित २रे मराठी साहित्य संमेलन२०२२ उत्साहात संपन्न.सकाळी ग्रंथदिंडी काढून दिव्य सानिध्य म.नि.प्र.श्री.प.पू.गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी आणि प्रा,डॉ.विनोद गायकवाड़ ( विभागप्रमुख मराठी विभाग राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगांव हे संमेलनास अध्यक्ष म्हणून लाभले. झाले. प्रमुख उपस्थिती डाॅ,सुरेश कुराडे. विचारवंत व साहित्यक उपस्थीत होते. शेवटच्या सत्रात प्रसिद्द साहित्यक, कथाकथनकार लेखक प्रा,शांतीनाथ मांगले बलवडी यांनी आपल्या भाषणात,साहित्य चळवळीस चालना मिळण्याकरिता साहित्यिक मंडळींचं योगदान असायला हवं असे सांगून समाजिक,शिक्षण,सहकार विषयी लेखकांनी लिहले पाहिजे,कथाकथनातून निव्वळ मनोरंजन न करता त्यातून बोध घ्यायला हवा असा सल्ला दिला. ग्रामीण भागातील लोकांच्या चालण्या बोलण्यातून कशी विनोद निर्मीती होते.हे पटवून सांगितले.घरातल्या घरात सुध्दा विनोद निर्माण होतात हे आपल्या खास विनोदी शैलितून सांगण्याचा प्रर्यंत्न केले. ग्रामीण ढंगातील कथा कथन करून खेड्यापाड्यांततील गाय,म्हैश,रेडकू,कुत्री,मांजरं यांचे हुबेहूब आवाज काढून व लहान मुलांचे हावभाव करून रसिकांची मने जिंकून संमेलनात हास्या पिकवला.आभार आयोजक डा .पत्रकार विक्रम बसवंत शिंगाडे यांनी मानले.