दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
गेल्या अनेक महिन्यापासून वाडा भिवंडी महामार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेक तक्रारी विविध मंत्री, मंत्रालयातील सचिव, प्रशासकीय अधिकारी, आमदार ,खासदार यांना देवून झाल्या परंतु परिस्थितीतअद्याप जैसे थे आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात होतात व गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरीही प्रशासन आजुन झोपेतच आहे.
या रस्त्यामुळे स्थानिक रिक्षा टेम्पो गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे कुडुस येथील रिक्षा टेम्पो युनियनने प्रत्येक गाड्यांवर स्टीकर लावून
प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध विविध गाड्यावर पोस्टर चिटकुन व्यक्त करण्यात आला. आधीच कोरोना काळात रिक्षा व टेम्पो चालकांचे मोठे नुकसान झाले हाेते व हप्तेही भरण्याचे वांदे झाले हाेते त्यातच आता कुठेतरी व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाल्याने भाडे मिळायला लागली असून वाडा भिवंडी महामार्गाच्या दुरावस्थेमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे तसेच खड्ड्या मुळे व खराब रस्त्यामुळे अपघातही होतात याकरिता प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता निषेधाचे पोस्टर चिटकवून निषेध व्यक्त केला.