दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -दत्तात्रय कराळे
परभणी : जिल्ह्यातील झिरो फाटा येथे नांदेड जिल्ह्यातील लोहा या तालुका स्थानकावरुन सोडली जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा व्हाया अंतेश्वर मार्गे सुरु करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भूमीपुत्र, समाजसेवक तथा चालू वार्ता या लोकप्रिय दैनिकाचे परभणी प्रतिनिधी दत्तात्रय वामनराव कराळे यांनी केली आहे.
लोहा बस स्थानकातून परभणी जिल्ह्यातील झिरो फाटा साठी व्हाया पेठशिवणी पाटीवरुन खरब धानोरा, पारवा, भोगाव, चित्रावाडी, भारस्वाडा, अंतेश्वर टच करुन पुन्हा चित्रावाडी, भारस्वाडा, भोगाव- मारुती देवालय टच करणे आणि नंतर वाणी-पिंपळगाव मार्गे धनगर टाकळीहून पुढे पूर्णा मार्गे झिरो फाटा या नियमित स्थळी सोडली जावी, अशी मागणी पत्रकार दत्तात्रय कराळे यांनी केली आहे.
लोह्यावरुन अगोदरपासूनच झिरो फाट्यासाठी ही बस सेवा गेली कित्येक वर्षे सुरुच आहे. तथापि ती सेवा पेठशिवणीवरुन थेट वाणी पिंपळगाव आणि पुढे धनगर टाकळी, पूर्णा वपढे झिरो फाटा अशी आहे. त्यामुळे अनेकदा या बसमध्ये अल्प प्रमाणात प्रवासी असतात ज्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. परंतु हीच सेवा कांहिशी दूरवरुन परंतु ब-याचशा गावांशी टच केल्या मुळे नमूद गावांच्या नागरिकांनाही त्या सेवेचा लाभ मिळू शकेल. शिवाय ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा असलेले तीर्थक्षेत्र अंतेश्वर आणि मारुतीचे भोगाव येथे नियमित जाणारे भाविक भक्तांना सुध्दा या बस सेवेचा लाभ घेता येईल ज्यामुळे महामंडळाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल यात तिळमात्र शंकाच नाही.
महामंडळाच्या अधिका-यांनी नमूद सूचित केलेल्या गावांचा व तेथे मिळू शकेल अशा लोक वहातुकीचा सर्व्हे केल्यास निश्चितच त्यांच्याही लक्षात येऊ शकेल. गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी अशी योजना महामंडळ व महाराष्ट्र शासन राबवत असताना काही गावांनाच जाणीवपूर्वक वगळून ही सेवा पूर्णत्वास कशी जाऊ शकेल असे मलाच नव्हे तर सुजलाम, सुफलाम महाराष्ट्रातील कोणाही नागरिकांना वाटणे स्वाभाविक आहे.