दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी-
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजातील सर्वच घटकांच्या हितासाठी होते “ये आजादी झुठी है , देश की जनता भुखी है ! हे अण्णाभाऊंचे विधान कुठल्या एका जातसमुहाचा विचार मांडणारे नसून ते संपूर्ण भारत देशातील जनतेचा कैवार घेणारे आहे, असे प्रतिपादन प्रा.विकास पाथरीकर यांनी केले.
मंठा येथे संपन्न झालेल्या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या विचारपीठावरून ते बोलतांना पुढे म्हणाले की, जगातील सर्व समाज जसा लॉकडाऊनग्रस्त होता तसा भारतातील आजचा मातंग व बौद्ध समाज गावाबाहेर पिढ्यान् पिढ्या लॉकडाऊनग्रस्त होता. त्याच्या प्रवाहात येण्याच्या सर्व वाटा बंद केलेल्या होत्या म्हणून या समाज बांधवांनी नेहमी एकत्र येऊन आपल्या सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मंठा येथे १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचा सोहळा संपन्न झाला.सकाळी शांततारॅली काढून १० वाजता डॉ. प्रवीण माळेगावकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंठ्याचे माजी उपनगराध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर लगेच विचारपीठावर प्रमुख वक्त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.प्रताप चाटसे हे होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.विकास पाथरीकर यांची उपस्थिती होती. विचारपीठावर ज्येष्ठ समाजसेवक मारोतराव खनपटे, कार्यकर्ते रंगनाबापू वटाणे, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले, नगरसेवक अरूण वाघमारे, राजेश खंदारे, पोलीस निरिक्षक संजय देशमुख अॅड. अनिल मोरे, अॅड. सुमेध आवारे यांची उपस्थिती होती.
यावेळी साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर बोलताना म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे, त्यांचे कार्यच प्रेरणादायी आहे, तरूणांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करावे. आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलतांना डॉ.प्रताप चाटसे म्हणाले की, तरुणांनी समाज परिवर्तन करण्यासाठी अगोदर विचारपरिवर्तन केले पाहिजे आणि विचार परिवर्तन करणारे कार्यकर्ते गावागावात
निर्माण केले पाहिजेत. तरच जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेश खनपटे यांनी केले.
सायंकाळी ५ वाजता लहुजी चौकातून निघालेली अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक मंठा फाट्यावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासमोर येऊन विसर्जित करण्यात आली, विसर्जनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास डॉ. प्रताप चाटसे, डॉ.धोंडोपंत मानवतकर जयंतीचे अध्यक्ष लखन कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. समाजभगिणींनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मा.नगरसेवक राजेश मोरे, व पोलीस निरिक्षक संजय देशमुख यांच्यासह कार्यकर्ते शरद मोरे, धुराजी कांबळे, पोलीस बांधवांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर रात्री साडेआठ वाजता मिरवणूकीची सांगता झाली. मिरवणूकीत बालासाहेब घनवट, संजय गायकवाड,अॅड सिद्धार्थ अवसरमोल, सुरेश वाहुळे, अशोक अवचार , बौध्दाचार्य महेंद्र टेकुळे अतुल खरात जयभीम सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव वाघ व ता.अध्यक्ष उद्धव सरोदे यांचा आवर्जून सहभाग होता. जयभीम सेनेच्या वतीने समाजबांधवांना चहा आणि पाण्याची सोय केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष लखन कांबळे, अहिंसक वाघमारे, मारोती खनपटे, राज खनपटे, अजय गायकवाड, मारोती , चंद्रकांत खनपटे, धम्मानंद वाघमारे, पिराजी पवळे,योगेश गायकवाड, निलेश मोरे, विश्नोद खनपटे,प्रदीप कांबळे,प्रभाकर कांबळे यांच्यासह लहुजी साळवे मित्रमंडळ व सारनाथ युथ यांनी परिश्रम घेतले.