दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-किशोर वाकोडे
जळगांव जामोद: दि. ५. वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. जि.एस.टी काउंसिलच्या ४७ व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दि.१८ जुलै पासून काही वस्तू व सेवावरील जि.एस.टी दरवाढ लागू केली. त्यामध्ये सामन्य जनतेच्या हिताच्या व दैनंदिन वापराच्या दुग्धजन्य वस्तू व कृषी उत्पादने जि.एस.टी कक्षेत आणून सरकारने सामान्य माणसाला जिवन जगने अवघड केले आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना जगू द्यायचे नसेल ते घेत असलेल्या प्राणवायु वरही जि.एस.टी कर लावा असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष गवई यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना उपविभागीय अधिकारी ( राजस्व) जळगांव जामोद यांच्या मार्फत निवेदन दिल्यानंतर प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला.ह्यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ह्या निवेदनावर संतोष गवई, रामकृष्ण रजाणे,देवानंद दामोदर, सुनिता हेलोडे, सोनमताई वानखडे, मुजिबखान, ज्ञानेश्वर कोकाटे, महादेव बोदडे, सुपडा बांगर इत्यादीच्या सह्या आहेत.ह्यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.