दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
नांदेड – जवळा देशमुख येथील भुमीपूत्र भारतीय सैन्य दलातील नायक श्रावण सखाराम गोडबोले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा मंगळवार दि. २ ऑगस्ट रोजी त्यांचे जन्मगावी जवळा येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाला.अनेक शौर्य पदके मिळवून त्यांनी तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
भारतीय सैन्यामध्ये बावीस वर्षे यशस्वीरित्या सेवा आणि कर्तव्य बजावल्यानंतर सेवानिवृत्त होऊन जवळा या त्यांच्या जन्मगावी श्रावण गोडबोले हे परतत असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या जवळा या गावामध्ये त्यांच्या स्वागतासाठी गावातील महिला पुरुष तसेच पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या उत्साहाने सकाळपासूनच गावामध्ये दाखल झाले होते. सकाळी नऊ वाजता पनवेल नांदेड रेल्वेने श्रावण गोडबोले यांचे नांदेड रेल्वे स्टेशनवर आगमन होताच जवळा येथील काही नागरिकांनी तसेच नांदेड शहरातील नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी करून त्यांचे पुष्पहार घालून आनंदात स्वागत केले. नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यांनी प्रथम पुष्पहार अर्पण केला. यावेळेस वंदे मातरम, भारत माता की जय, परिसर दणाणून गेला होता. पुढे नांदेड ते जवळा या मार्गावर त्यांचे विष्णुपुरी, वाडीपाटी, जानापुरी, सोनखेड आणि बोरगाव येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये मोठमोठे हार घालून स्वागत केले.
गावामध्ये पोहोचताच गावातील सरपंच पोलीस पाटील सेवा सहकारी सोसायटी चेअरमन आणि सर्वच महिला पुरुषांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. तसेच गावातून मिरनुक निघाली असताना प्रत्येक घरच्या महिलांनी त्यांची ओवाळणी करून स्वागत केले. नंतर गावातील विश्वशांती बुद्ध विहाराच्या मैदानावर मोठ्या मंडपामध्ये त्यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनआण्णा हंबर्ड, प.स.सदस्य,श्रीनिवास मोरे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, कॅप्टन डी. एस. वाघमारे, सुभेदार पंडित मस्के, सुभेदार काशिनाथ ससाने, गावच्या सरपंच सौ.कमलताई साहेबराव शिखरे, जवळा गावचे माजी पोलीस पाटील गोविंदराव मोरे, माजी सैनिक अधिकारी रावसाहेब शिंदे, उद्धव डिकळे, आंबेडकरी विचार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गच्चे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू गोडबोले, गंगाधर ढवळे यांच्यासह पंचक्रोशीतील महिला पुरुषयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, कॅप्टन डी. एस. वाघमारे, सुभेदार पंडित मस्के, सुभेदार काशिनाथ ससाने, सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू गोडबोले यांची यथोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आनंद गोडबोले यांनी तर प्रस्ताविक आणि आभार भैयासाहेब गोडबोले यांनी मानले.