दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-कवी सरकार इंगळी
सोमवार दिनांक ८ आगस्ट २०२२ रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन मध्ये मुंबई कांदिवली मधील पत्रकार भारत कवितके यांना “पत्रकार भूषण ” हा पुरस्कार पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने जेष्ठ संपादक सुकृत खांडेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.यावेळी कृषीभूषण,समाजभूषण,उद्योगभूषण,पत्रकार भूषण,शिक्षणभूषण आदि विविध क्षेत्रातील व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी जेष्ठ संपादक सुकृत खांडेकरानी मार्गदर्शन करताना खंत व्यक्त केली, ” सरकार व प्रशासनावर धाक असलेला आजच्या पत्रकारितेचा मध्ये सध्यातरी एकही संपादक आस्तित्वात नाही. पूर्वी शासनाला संपादकाच्या नावाचा धाक असायचा .कोरोना प्रादुर्भाव काळात मुंबई लोकल प्रवासात सरकारों, निमसरकारी, महानगरपालिका अशा सर्व कामगारांना सुट होती.पण त्यावेळेच्या सरकारने मात्र पत्रकारांना सुट दिली नव्हती.ही अत्यंत खेदाची बाब आहे,तरीही पत्रकारांनी दोन दोन बस बदली करुन,प्रवास करुन बातम्या मिळवून दिल्या.त्यांचे खरोखरच कौतुक आहे.काही पत्रकारांना कोरोना झाला.पत्रकारांच्या घरातील नातेवाईकांना कोरोना झाला,तरीही पत्रकारांनी त्यांचे काम चोखपणे केले.या प्रसंगी आमदार संजय केळकर,मनोहरराव सुने,कैलास देशमुख,ह.भ.प.सरस्वती ,विलास खानोलकर,संदीप लेले,मुनीर खान आदि मान्यवर उपस्थित होते.
कवी सरकार इंगळी