दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली तलावावरील शेती सिंचनाचा गेल्या शंभर वर्षापासून चालत आलेला कायदेशीर हक्क आबाधित ठेवण्यासाठी दहा गावातील लाभार्थी शेतकरीवर्गाने सतर्क व जागरूक राहीले पाहिजे, असे मत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी व्यक्त केले.
बावडा येथे शेटफल तलाव बचाव कृती समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पाटील बोलत होते, आपल्या प्रस्ताविक भाषणात समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षापासून आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण; मा,उच्च न्यायालय,प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांच्याकडे कायदेशीर लढा कसा दिला याची माहिती देऊन सध्या तलावावरील आठ पाणी वापर संस्था व दोन लाभार्थी शेतकरी विरुद्ध याचा निर्णय घेणारे दहा शासकीय अधिकारी व उचल पाणी परवाने दिलेल्या ६५ शेतकरी विरुद्धचा दावा पीडीआरो सिंचन भवन पुणे यांच्या न्यायालयात सुरू आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले याबाबत लोक गंभीर राहीले नाहीत तर या भागाचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही मेळाव्यास बावडा,सराटी,पिठेवाडी,भगतवाडी,वकीलवस्ती,भोडणी,निरनिमगाव,सुरवड या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार महादेव घाडगे यांनी मानले यावेळी उदयसिंह पाटील ,प्रताप पाटील,विकास पाटील,किरण पाटील,अजय पाटील, शिवाजी हांगे ,संतोष पाटील इ,मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.