दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मागील काळातील व अधून मधून सध्याही पडणा-या संततधार पावसामुळे नवा मोंढा मुख्य बाजार पेठेतील रस्त्याची कमालीची दूरावस्था झाली आहे.
मनपा आयुक्त देविदास पवार यांना व लोकप्रतिनिधींनाही येथील व्यापाऱ्यांनी सदरच्या रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार सांगितले, अर्ज विनंत्या केल्या तरीही या कामी त्या सर्वांची अनास्थाच दिसून आली आहे. कंटाळलेल्या व्यापारी व कर्मचारी वर्गाने आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. परभणी शहरात मुख्य बाजार पेठ असलेल्या या नवीन मोंढ्यात तालुका व जिल्हाभरातील हजारो शेतकरी व अन्य ग्राहकांची सततची वर्दळ असते. शेतकरी, व्यापारी वर्ग व कर्मचारी यांना या चिखलमय रस्त्यांवरुन पायी प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे होऊन बसले आहे. दुचाकीवरुन प्रवास करायचा म्हटलं तर त्या घाणीत कधी पडेल याचीच भीती वाटते. त्यांना जीव मुठीत धरुन तर चार चाकी वाहनांवर नि पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांवर ती घाण कधी उडू शकेल याचा नेम नसतो. पायी चालायचे तर संपूर्ण पादत्राणे खराब होतात तर कोणाच्या पायांना चिखल्या येतात. विद्युत मंडळ व महापालिकेकडून आकारले जाणारे भरमसाठ असले तरीही ते सर्व प्रकारचे कर व्यापारी न चुकता भरतात. तरीही सुविधांच्या बाबतीत मनपा प्रशासन पूरती अनास्था दाखवत असते. आयुक्त देविदास पवार यांना प्रत्यक्ष भेटून व अनेकदा निवेदने देऊनही जर काहीच उपयोग होणार नसेल तर आंदोलनाशिवाय पर्यायच उरला नसल्याचे संतप्त व्यापारी वर्गाने बोलून दाखवले. याप्रकरणी अनेक लोकप्रतिनिधींशी पण संपर्क साधून व्यापारी वर्गाने आपली कैफियत मांडली असल्याचा दावा केला आहे. त्यांचीही या प्रकरणी अनास्थाच दिसून आली असल्याचे म्हटले जात आहे.
परभणी शहर व लगतच्या बहुतांश मग त्या नागरी वस्त्या असोत वा बाजार पेठा रस्त्यांची भयंकर अशी दूरावस्थाच झाल्याचे दिसून येते आहे. नानाविध कर भरुनही नागरिक व व्यापारी वर्गाला नागरी सुविधा मिळत नसतील तर यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे ? खेदजनक बाब तर ही आहे की, नागरिकांना तीव्र आंदोलने केल्याशिवाय रस्त्याच्या मागणीकडे ढुंकूनही बघितले जात नाहीय.
खानापूर फाट्यापासून पिंगळी रोडला जोडला जाणारा कॅनॉलच्या पुलापर्यंतचा रस्त्याची सुध्दा भयानक अवस्था झाली आहे. या रस्त्यावर असंख्य खड्डे पावसामुळे पडले असल्याने पायी रहदारी करणार्या प्रवाशांना अक्षरशः ठेचा लागतात तर दुचाकी व चारचाकीद्वारे प्रवास करणाऱ्यांचे कंबरडेच मोडले जातेय. कित्येकांना तर मणक्यांचा विकार जडला असल्याचे बोलले जात आहे. वरकरणी खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणारा नव्हे तो वरवर टाकलेल्या माती वजा मुरुमाचा पाऊस पडला की चिखल बनला जातो परिणामी ती गाणही प्रवाशांच्या अंगावर चढली जाते. हा रस्ता जर लवकर सुधारला जाणार नसेल तर मात्र लवकरच आंदोलन छेडले जाऊन रास्ता रोको केला जाणार असल्याचे समजते. परिणामी पिंगळी कडे जाणारी वाहतूक ठप्प होऊन जाईल यात शंकाच नसावी.