दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
राज्य शासनाने लोहा तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ अनुदान वाटप करावे अशी मागणी शिवसेना प्रणित किसानसेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात गेल्या दीड महिन्यांपासून लोहा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
राज्य सरकारने नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली असल्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३८०० रूपये अनुदान जाहीर केले व अतिवृष्टी ग्रस्तांना ही अनुदान देण्यात येईल असे जाहीर केले आहे.
यात लोहा तालुक्यात तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे शासनाने अनुदान जाहीर केले आहे परंतु अद्याप पर्यंत त्यांची अमंलबजावणी झाली नाही.
आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शासनाने लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट जाहीर केलेले अनुदान वाटप करावे अशी मागणी शिवसेना प्रणित किसानसेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी केली आहे.