दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत “तालुका स्तरीय समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात” गोकुंद्यातील १० शाळांमधील ५ हज़ार ३७० विद्यार्थी व ३०० शिक्षकांनी गाईले राष्ट्रगीत.
बुधवारी (ता.१७ सकाळी११ वाजता महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे पंचायत समिती , किनवटच्या वतीने “समूह राष्ट्रगीत गायन ” तालुकास्तरीय मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार(भाप्रसे), तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, माजी सभापती प्रतिनिधी दत्ताआडे , माजी पं.स. सदस्य निळकंठ कातले , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड , अभि. प्रशांत ठमके , केंद्र प्रमुख रमेश राठोड, अनिल तिरमनवार उपस्थित होते .
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र जाधव यांनी आभार मानले. सिमरन शेख अजिमोद्दीन, पुनम परसराम राठोड, निशा परसराम राठोड यांनी देशभक्ती गीते सादर केले. वेदिका सुनिल अनंतवार हिने जोषपूर्ण भाषण केले. सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार व आमदार भीमराव केराम यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ९ ऑगष्ट पासून सुरू झालेल्या विविध उपक्रमांचा समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाने समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शेख हैदर, उपप्राचार्य सुभाष राऊत , उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक संतोषसिंह ठाकूर , किशोर डांगे व प्रमोद मुनेश्वर यांचेसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.