दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री. रमेश राठोड
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
यवतमाळ जिल्हा परिषद मधील अनुसूचित जाती व जमातीच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण सभा नियमानुसार तीन महिन्यात आयोजित करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या दालनामध्ये विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ भवरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने समस्या. 3 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार बिंदू नामावली निश्चित करून विभागीय आयुक्त यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. बिंदू नामावली साठी प्रस्ताव सादर करणे. पेसा कायद्याअंतर्गत मंजूर असलेली “क” वर्गातील पदे स्थानिक आदिवासी उमेदवारांना भरती करणे. वाहन चालक,चौकीदार, शिपाई यांची रिक्त असलेली पदे तात्काळ भरणे. रिक्त असलेल्या जागेवर अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांची भरती करणे, जिल्हा परिषदेमधील सर्व विभागाच्या सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करून आक्षेपा सहित दुरुस्ती करणे. वित्त व लेखा विभाग यामधील अद्याप पर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया न केल्यामुळे ती तात्काळ करणे.
विभागीय खाते चौकशी प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करणे, बोगस आदिवासी तथा जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर नियुक्ती देणे, आंतर जिल्हा बदलीचे प्रकरणी निकाली काढणे, 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या व पेन्शन मंजूर नसलेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजनेचा खात्याचा हिशोब मिळणे, प्रांनकीट निर्गमित करणे , जिल्हा परिषदेला मागासवर्गीय कक्षाची स्थापना करून कास्ट्राईब कर्मचारी संघटने करता स्वतंत्र कक्ष देणे. सेवेत कायम झालेल्या ग्रामसेवकाची अनामत रक्कम परत करणे,आरोग्य प्रतिपूर्ती देयक (मेडिकल बिल फाईल) तपासणी करताना संबंधित विभागाने फक्त हा आजार त्या बिलामध्ये मोडतो काय, एवढेच तपासणी आवश्यक असताना विनाकारण त्रुटी शोधण्याचे काम केल्या जाते. वेतन निश्चिती करता संबंधित विभागाकडून सेवा पुस्तक पाठवल्यानंतर विभाग प्रमुखाकडे न पाठवता सरळ वित्त विभागाला सादर करायला पाहिजे.विभाग प्रमुखांकडे पाठवून विनाकारण विलंब होतो. तीन महिन्याने होणारी सभा ही मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात आयोजित करावी. याच आधारावर तालुकास्तरावरील समस्या निवारण बाबत सर्व गटविकास अधिकारी यांना आदेशित करण्याबाबत मागणी केली. यासह अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य श्री.पंकज भोयर यांनी वरील समस्या या रास्त असून सर्व विभागांना पत्र देण्यात येईल असे सांगितलेल.या सभेसाठी जिल्हा अध्यक्ष गोविंद इंगोले, सचिव भारत भितकर, वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल पेटकर,प्रशांत भगत,ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेव थुल, सुनिल वनकर ,आर.एन. चंदनकर,राजेंद्र खरतडे, सुहास परेकर, संजय ढोले,जितेन्द्र बागेश्वर, यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते. या सभेचे इतिवृत्त सात दिवसात मिळणार असल्यामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली निघतील अशा पल्लवीत झालेल्या आहेत.