दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सृष्टीच्या अलिखित नियमानुसार जन्म आणि मृत्यू निश्चित आहे .या मध्ये कोणतीही शक्ती जसं सत्ता , संपत्ती ऐश्वर्या, विज्ञान युगातील प्रगती या पैकी कोणीतीही बाब बदल करू शकत नाही. तसंच आपल्यला मिळालेलं हे मानवी शरिर नश्वर आहे . मग हे सगळं एवढं किलियर आहे.तस पाहिलं तर जीवन कालावधी पण निश्चित नाही.मग क्षणभंगुर असणार हे जीवन तरी सुद्धा आपण मनात दुःखाचे पर्वत कशासाठी निर्माण करतोय .तसं पाहिलं तर जीवनच म्हणजे जखमांचा बहुपाश . वेगवेगळ्या वयातील वेगवेगळ्या जखमा पण त्या मनाला झालेल्या मग त्याची सल तर जाणवणारच कारण जखामांचे निर्माते हि आपण स्वतःच आहेत. परंतु आपण स्वतः हे कधीच मान्य करत नाही .हेच आश्चर्य आहे . आपल्या मानत ज्या सतत सल करणार्या जखमा आहेत. याचे निर्मिते सुद्धा आपण स्वतः आहे . यासाठी इतर कोणीही कारणीभूत नाही. यासाठी आपण इतरांना जबाबदार समजतो ते आपलं सुद्ध अज्ञान आहे . मुळात आपण कही तरी विपरीत किंवा निसर्गाला मान्य नसेल अशा काही तरी आपल्या विचित्र मागण्या मनात निर्माण करून वावरत असतो .मग त्या मागण्या जीवन जगत असताना वेळेवर किंवा योग्य वेळी पुर्ण होत नाहीत.किवा काही विषयात अपेक्षा भंग झालेला असतो . ज्याच्या वर विश्वास ठेवला त्यानं दगाफटका केलेला असतो . महत्वकांक्षा पुर्ण झालेली नसते .जे जे आपले हेतु असतात ते सुद्धा साध्य झाले नाही तर म्हणजे एकंदरीत दैनंदिन जीवनातील प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने अपयश पराभवाला सामोरे जावे लागले. तर आपण खिन्न होऊन जखम निर्माण करतो .असे अनेक कारणं जखामा होण्यासाठी कारणीभूत आहेत. ज्या मुळे मनात जखमा निर्माण होतात . परंतु खरा ज्ञान पुर्वक विचार केला तर या क्षुल्लक कारणावरून मनात जखम निर्माण करून घेणे म्हणजेच आपण किती अज्ञानी आहेत ? बहुतांश म्हणजे अगदी अपवादात्मक काही लोक सोडले तर प्रत्येकाच्या मनात कोणती ना कोणती सल जखम असतेच जखम हि लहान मोठी असु शकते त्या मध्ये सुद्धा कोणाची जखम जुनी झाली असते . तर कोणाची ताजी जखम असते .मग हिच जखम वारंवार सलते आणि आणि उद्विग्नता येते .जखम होऊ देणं हेच मुळात अज्ञान आहे. आणि कळत न कळत जखम झाली तर ती तात्काळ कशी दुरूस्त होईल हे ज्ञान अवगत असल पाहिजे .मनातील जखमा ह्या वैद्यकीय उपचार घेऊन बर्या होत नाहीत .तर त्यासाठी स्टीक उपचार काय हे सुद्धा समजणं गरजेचे आहे. अनेक जखमा ह्या सार्वजनिक करुन तीव्रता कमी करता येते परंतु काही जखमा ह्या सार्वजनिक करता येत नाहीत. आणि त्याची सलही कमी होत नाही. मग अशा वेळी जखम मनात कधी पर्यंत साठवणार ? आणि कशासाठी साठवणार ? मुळात निस्वार्थी निःसंकोचपणे साधं सरळ सोप्या पद्धतीने अंहकार मुक्त , आणि ज्ञान युक्त , निर्मोही,जीवन जगता आल तर मनात जखम निर्माण होणार नाही . आणि या अगोदर निर्माण झालेल्या जखमांवर ज्ञान हाच एकमेव उपाय आहे .आता नेमकं कोणतं ज्ञान गृहित धरावं तर ज्या पद्धतीची जखम मनात झाली आहे .त्याच पद्धतीच ज्ञान त्या जखमेला बरं किंवा कायमचं दुरूस्त करू शकत . आणि म्हणून आपण ते ज्ञान मिळवण्या ऐवजी जखमेलाच कुरवाळत बसतो .आणि मग त्याच्या वेदना वाढवतो . मुळात असं करणं चुकीचं आहे.आणि म्हणून अंसं न करता त्या त्या जखमांवर उपयुक्त अस योग्य ज्ञान वारंवार संगृही ठेवून आपण या जखमा कायमच्या बर्या करू शकतो. आणि ज्या पद्धतीची मनातील जखम आहे त्या पद्धतीचे ज्ञान अवगत करून आपण या जखमांच्या ओझ्या खालुन मुक्त होऊ शकतो.आणि अशा पद्धतीने मनाला जखमच होणार नाही यासाठी सुद्धा त्या त्या पद्धतीचे ज्ञान आपण अवगत केले पाहिजे जेणेकरून मनाला जखम होणार नाही.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301