दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
छत्रपती,शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळगड चा इतिहास मोठा आहे.येणारे पर्यटकांची संख्या पण जास्त आहे.दि. ६\७\२२ ला चार दरवाजा या ठिकाणी मंगळवार पेठ कडे जाणारा पायी रस्ता च्या वरच्या बाजूच्या असणाऱ्या तटबंदीचे काही भाग ढासळला आहे. असेच किल्ल्याच्या तटबंदीचा अनेक ठिकाणी भाग ढासळत आहे त्यामुळे इतिहास प्रेमी,पन्हाळगड वासिय,आजूबाजू गावकऱ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील एकमेव असा किल्ला की ज्या ठिकाणी सुस्थितीत असणारे इमारती आजही आपल्याला पाहण्यास मिळतात अतिवृष्टीमुळे व चार-पाचशे वर्षांपूर्वीच्या जुन्या ऐतिहासिक इमारती व तटबंदी यांना धोका निर्माण झाला आहे. त्यांची डागडूजी करणे गरजेचे आहे.त्याकरता गावकऱ्यांनी मध्यंतरी मा.जिल्हाधिकारी यांना ,केंद्रीय मंत्री यांना निवेदन दिले होते. त्या संदर्भात मा. खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा अधिक माहितीसाठी हे निवेदन दिले गेले आहे.
काल दि,१८/८/२२ मा जिल्हाधिकारी,मा खासदार मा धनंजय महाडिक यांची गावातल्या नागरिकांनी भेट घेऊन पन्हाळा संवर्धन संदर्भात निवेदन देण्यात आले मा. खासदार धनंजय महाडिक साहेबांनी बराच वेळ चर्चा गावकऱ्यांबरोबर केली व एक आश्वासन दिले की ” केंद्रातील कोणतेही काम न थांबता पूर्ण करून देण्याची माझी जबाबदारी आहे. ते मी १००% टक्के पूर्ण करून देईन केंद्रातील तुम्हि काही काळजी करू नये . त्यामुळे पन्हाळकरांना केंद्रांत एक मोठा आधार मिळेलेची आशा आहे. “गावकऱ्यांकडून त्यांची भेट घेऊन पन्हाळा संवर्धन संदर्भात निवेदन देण्यात आले. व महाराष्ट्रातील एकमेव असा किल्ला आहे की ज्या ठिकाणी नागरिक वस्ती लोकल सामान्य नागरिकांचा राहात आहेत, त्यांचाही उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालावं ही स्थानिक नागरिकांची मागणी प्रामुख्याने आहे,मा .महाडिक बराच वेळ चर्चा केली व एक आश्वासन दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष, चंद्रकांत गवंडी, आसिफ मोकाशी. माजी उपनगराध्यक्ष रवींद्र घडेल ,माजी नगरसेवक रवींद्र तोरसे, सामाजिक कार्यकर्ते,चेतन राऊत,अमित पवार, रमेश स्वामी,