दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : या मुंबई दौऱ्यात राजकीय चर्चा होण्याचीही दाट शक्यता असून ही चर्चा प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्र्यांना स्थान देण्यात आले होते. मात्र त्या विस्तार स्थान न मिळालेल्या नेत्यांमध्ये नाराजी असून सप्टेंबरमध्ये पुन्हा विस्तार करण्याचे आश्वासन देऊन नाराज नेत्यांची समजूत काढण्यात आली आहे. आता विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अमित शहा हे त्यापूर्वी म्हणजे ५ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याने नव्या मंत्र्यांच्या नावांबाबत चर्चा होणार हे नक्की आहे. यात पहिल्यांदा डावलेल्या आणि नाराज असलेल्या काहींना कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यातही मंत्रिपद मिळविण्यासाठी अनेकांनी लॉबिंग केले असल्याने कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे.