दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी म्हणाल्या, “महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केलेत. हा पैसा कुठून आला? तुम्ही झारखंडच्या आमदारांना पैसे देऊ केलेत. तुम्हाला झारखंड सरकार पडायची आहे. मी हे थांबवले आहे. अरविंद केजरीवाल म्हणतात, त्यांच्या आमदारांना पैसे देऊ केले आहेत. बंगालमध्ये त्यांनी तपास यंत्रणा आमच्या मागे लावल्या आहेत.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ कोलकाता येथे दोन दिवसीय धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व टीएमसीच्या दोन महिला मंत्री करणार आहेत. त्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी करत दोषींना पुन्हा तुरुंगात पाठवावे, अशी मागणी केली आहे.