दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मी चांगला आहे . म्हणून कोणी चांगला ठरत नाही.चांगला होण्यासाठी प्रयत्न केल्याने बदल घडु शकतो .पण तो प्रयत्न प्रदर्शनासाठी नाही तर वास्तविक चांगलं होण्याचा दृष्टीने असला पाहिजे. लोकांनी आपल्याला चांगल म्हणावं ,आपली स्तुती करावी, आपल्या विषयी गौरव उदगार काढावेत आपल्या कौतुकाचे पोवाडे गावेत अस बहुतांश लोकांना वाटत असत.यासाठी अहोरात्र प्रयत्न पण चालू असतात . पण प्रदर्शनासाठी चांगलं होण्याचा प्रयत्न करणं आणि अंतःकरणातुन चांगलं असण या मध्ये खुप फरक आहे.म्हणून चांगलं होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे चांगल होणं असं होतं नाही. तर आपल्या स्वतः च्या नजरेत समाधान वाटेल एवढं चांगलं होता आलं तरी पुरेसं आहे . म्हणून प्रदर्शनासाठी नाही तर अंतःकरणातुन चांगले व्हा .लोकांच मत आणि भुमिका हि वेळेनुसार सोयीनुसार सदैव बदलत असते. त्या भुमिके साठी स्वतः मध्ये केलेला बदल हा अस्थायी बदल असतो.व त्याचे परिणाम पण तसेच असतात . लोकीक हे फार भयानक वास्तव असतं.लोक आज आपल्याला चांगल म्हटले तर उद्या वाईट म्हणून शकतात .या मध्ये दुमत नाही.लोकांची भुमिका हि वेळेनुसार, सोयीनुसार बदलत असती .आणि सध्याच्या काळातील लोकांची पसंद तर खुपच चंचल व गतीमान आहे.अशा परिस्थितीत लोकांच्या पसंतीस यावं म्हणून आपल्या आचरणात बदल करणं हा तात्पुरता बदल ठरू शकतो. याचे दिर्घ कालीन परिणाम नक्कीच सुयोग्य येणार नाहीत . कारण जो स्वतःच्या विवेकावरून आत्म सन्मान व समाधानासाठी निस्वार्थी वृत्ती ने चांगलं आचरण करतो .तो युगोयुगे चांगला म्हणून गणला जातो . म्हणून अंतःकरणातुन चांगले व्हा .आपलं आचरण हे लोकांच्या मतानुसार ठरत असेल तर मग त्याला फारसा अर्थ नसतो .आपलं राहणीमान ,आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं ,आचरण,यावर लोकांचा नाही तर ,आपले , संस्कार आपलं धर्म शास्त्र, नैसर्गिक गुणांचा निती, न्याय, धर्माचा, प्रभाव असला पाहिजे.आणि आपण मन बुद्धी आणि विवेकाने वागल पाहिजे. आपलं वागणं हे इतरांच्या साठी प्रेरणादायी व आदर्श मार्गदर्शक ठरल पाहिजे.यासाठी अंतःकरणातुन चांगल होता आलं पाहिजे. आपण लोकांनी आपल्याला चांगला म्हणावं म्हणून चांगलं होण्याचा प्रयत्न करणं हे वास्तविक प्रदर्शन आहे . चांगलं होण हे आत्मिक समाधान मिळण्याच सर्व उत्कृष्ट साधनं आहे .पण बहुसंख्य लोक हे स्वतः साठी नाही तर इतरांच्या मतांसाठी त्यांनी त्यांचं मत भुमिका आपल्या विषयी चांगली व्यक्त करावी म्हणून चांगले होण्याचा प्रयत्न करतात. हे अतिशयोक्ती नाही तर सध्याच भायनक असं वास्तव आहे .दिसण आणि असणं या मध्ये जमिन असमानच अंतर असतं . आणि जसं दिसत तसं कदापिही नसतं म्हणून तर जग फसत असं आपले आजोबा ,पंजेबा तसेच जुन्या पिढीतील अनेक जुनी जाणती माणसं सहज बोलतात .व ते अगदी तंतोतंत लागू पडते. पण आपण या बोलण्याला अगदी सहज घेतो . प्रत्येक गोष्टीत आपवाद असतो त्या प्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत मध्ये जिथं दिसण आणि असणं एकच असतं ते चरण नक्कीच वंदनीय आसतात .महणुन लोकांच्या कडुन कौतुकास्पद तात्पुरते गौरव उदगार असतात . त्या साठी नाही तर स्वतः च्या जीवनाच सार्थक ह़ोईल अशा पद्धतीने चांगले व्हा म्हणजे स्वतःच्या नजरेत आत्मसन्मान, आत्म समाधान मिळेल . पण आज फारसं असं काही दिसत नाही लोकांनी मला चांगला म्हणावं आणि मग त्यासाठी मी काय काय करू शकतो .ते करण्याचा प्रयत्न जास्त प्रमाणात होतो .बरं लोकांकडून कौतुक व्हावं म्हणून आपल्या मध्ये निर्माण केलेलं चांगले पण किंती दिवस टिकणार याची मर्यादा किती असते ?तर खूप अल्पजीवी हा चांगले पणा फार काळ टिकत नाही .महणुन लोकांच्या साठी नाही प्रदर्शनासाठी नाही . तर स्वतः साठी चांगले व्हा अंतःकरणातुन अहेतुक चांगले व्हा जो चांगले पण तहयात टिकेल तो चांगलेपणा आपल्यामध्ये निर्माण करणयाचा प्रयत्न करा.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301