दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
समर्थ रामदास स्वामी यांची जन्मभूमी ऐतिहासिक जांब समर्थ येथे आज जालना विधानसभेचे आमदार कैलाशजी गोरंट्याल यांनी भेट दिली.
मंदिरात झालेल्या 450 वर्षापूर्वीच्या पुरातन पंचधातू मुर्तीची चोरी ही गंभीर बाब असुन याविषयी राज्यभरातील आणि देशातील भक्तांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत.
श्री.गणेश विसर्जनापर्यंत प्रशासनास याविषयी तपास करण्यास यश आले नाही तर याविषयी जालना जिल्हा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा आमदार कैलाशजी गोरंट्याल यांनी दिला असुन या प्रकरणात केंद्रीय यंत्रणेद्वारे तपासणी होऊन आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
यावेळी उपस्थित पोलिस निरीक्षक श्री. प्रशांत महाजन, संस्थानचे पुजारी श्री.धंनजय देशपांडे, बाबासाहेब तांगडे, डॉ. विलास तांगडे, संजय तांगडे,राजकुमार वायदळ, गोपाल तांगडे,अशोक देवकर, रामेश्वर तांगडे,जगण देवकर,सचिन जोशी, दत्ता घुले,अरुण घडलिंग,योगेश पाटील,गणेश चौधरी,महेश तांगडे,आदी ग्रामस्थ मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.