दैनिक चालु वार्ता मराठवाडा उपसंपादक- ओंकार लव्हेकर
कंधार तालुक्यात या वर्षी भरपूर पाऊस पडला आहे.त्यामुळे सर्वत्र पाणी झाले आहे.त्यामुळे पाणी प्रश्न जवळपास मिटल्यात जमा आहे.पण गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला होता त्यामुळे काही प्रमाणात पिके कोमजत होती.पावसाची आवश्यकता होती गर्मीचे प्रमाणही वाढले होते.पण रात्री अचानक हवामानात बदल झाला.अन् रात्री एक दरम्यान जवळपास अर्धा तास पाऊस पडला.अन् बळीराजा सुखावला आहे.त्यामुळे पिकांनाही जीवदान मिळाले आहे.
आज महालक्ष्मी आणि असल्यामुळे मार्केट मध्ये ग्रामीण भागातील भरपूर प्रमाणात नागरिक खरेदीसाठी आले होते.भरपूर प्रमाणात भाजीपाला,फुले, केळी,किराणा,जनरल स्टोअर्स यांचा जोरदार व्यापार झाला.बाहेर गावी असणारी मंडळी आज गावात भेटी गाठी घेत होती.