दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय कराळे
**************************
परभणी : कर्तव्यावर रुजू होताच मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी कामांचा सपाटा जोमाने सुरु केला आहे. मुंबई लगतच्या पनवेल महापालिकेत नागरी विकासाचा गाडा हाकताना अचानक निजामकालीन परभणीत झालेली बदली ही त्यांना नवखे स्थान असले तरी ज्यांना सामाजिक, नागरी, सांस्कृतिक व धार्मिक कार्याची आणि कर्तव्याची रुची असते नव्हे जाणीव असते, त्यांना ते पूर्णत्वास नेल्याशिवाय चैन पडत नाही असे म्हणतात ते काही खोटे नाही. त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच परभणीच्या नवनियुक्त आयुक्त तृप्ती सांडभोर ह्या आहेत.
श्री गजाननाच्या आगमनानंतर म्हणजेच अगदी दुसऱ्या दिवशीच १ सप्टेंबर २२ रोजी त्यांनी महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार ताब्यात घेतला. गणरायांचे आशीर्वाद घेऊन तृप्ती सांडभोर यांनी आपल्या कर्तव्याचा श्री गणेशा सुरु केला आहे. शहरी भागातली एक महिला अधिकारी ग्रामीण भागात आणि तेही विकासापासून अगदी कोसो दूर अशा परभणी शहरात त्यांचा टिकाव लागणार, त्यांची येथे काय डाळ शिजणार, येथे असलेली नानाविध आव्हाने त्या कशा काय पेलू शकणार, येथल्या किचकट राजकारणात त्यांचा निभाव खरोखरच लागू शकेल काय ? अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांचा बागुलबुवा करुन एखाद्या संशयी भुताटकी सारख्या प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्यांना तृप्ती सांडभोर या खरोखरच त्यांचे सर्व अंदाज खोटे ठरवतील यात शंकाच नसल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चारच दिवसांत त्यांनी आपल्या कामाचा सपाटा तो काय असतो, हे कृतीतून दाखवून देण्यावर भर दिला आहे.
श्री गणेशाचे आगमन, नंतर होणारे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि. दहा दिवसांचे विसर्जन व त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व महत्वपूर्ण घडामोडी ध्यानी घेऊन तृप्ती सांडभोर यांनी आयुक्त पद ते काय असते हे आपल्या कृतीतून दाखवायला घेतलेली प्राथमिक स्वरुपातील सुरुवात उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल.
शहरांतील रस्त्यांवर सोडले जाणाऱ्या मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी त्यांनी उचलेले पाऊल धाडशीच म्हणावे लागेल. मोकाट जनावरांना नव्हे तर त्यांना ज्यांच्याकडून जाणीवपूर्वक रस्त्यावर सोडले जाते, त्यांनाच आळा घालण्याचे काम आयुक्त म्हणून करुन शिस्त काय असते, हे दाखवून दिले आहे. त्याच बरोबर रस्त्यालगतची घरे व दुकाने यांच्या अवती भवती असलेली जेवढी बळकावल्या येईल अशी मोकळी जागा ज्यांनी ज्यांनी अतिक्रमित केली, ती कायद्याचा बडगा दाखवत त्यांनी तात्काळ रिकामी करवून घेतली, हे सुध्दा कमी नाहीय. महापालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन सुधारले जावे यासाठी त्यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाणी तर केलीच परंतु तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना निरनिराळ्या जबाबदाऱ्या देऊन प्रत्यक्षात कामाला लावले आहे. त्यातून होणारा घाण पाण्याचा विसर्ग व दुर्गंधी कशी थोपवणे शक्य होईल यासाठीचे नियोजन कृतीतून उतरवले आहे. ओला आणि सुका कचरा विलगीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कृतीतून सत्यात आणण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत ते सुद्धा कौतुकास्पद असेच म्हणावे लागतील. एकूणच काय तर गणेश बाप्पांच्या विसर्जनावेळी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची कटाक्षता त्यांनी आपल्या प्रिये जीव ॲक्शन मधून दाखवून दिले आहे.
अवघ्या पाच दिवसातली त्यांच्या कार्याची ही गती पहाता भविष्यातल्या गतिमान वारुची नांदी दाखवून दिल्याशिवाय त्या नक्कीच मागे हटणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करायला मुळीच हरकत नाही. गणेश विसर्जनानंतर तर तृप्ती सांडभोर यांना मोठ्या जिद्दीने व धाडसाने करावी लागणार आहेत. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते, शहरां तर्गतचे सर्वच रस्त्यांचे चित्र आयुक्त म्हणून करावे लागणार आहे. कांही ठिकाणी कायद्याचा दुरुपयोग तर कुठे वशिल्याचा बागुलबुवा उभा करुन ज्यांनी कुठे अतिक्रमणाचा विळखा घातला आहे, अशांना न डगमगता आयुक्त म्हणून कायद्याचा बडगा उगारणे भाग पडले तरी तो उगारावाच लागणार आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूने घाण व नैसर्गिक पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकेल अशी मोठी गटारे बनविली जाते आवश्यक आहे. पादचाऱ्यांना पायी प्रवास करतांना कोणताही अडथळा येणार नाही, असे पादचारी (फूटपाथ) रस्ते बनविणे आवश्यक आहे. जागोजागी स्वच्छता गृहे व सुलभ शौचालये बनविणे, समाज मंदीरे, सार्वजनिक वाचनालये बनवून ती कार्यरत ठेवणे, कारेगाव रोड ची दैन्यावस्था सुधारणे, तेथे वीज व्यवस्था कायम कार्यान्वित करणे, नियमित व मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा पुरविणे, कर आणि मालमत्ता कर व थकबाकी सक्तीने वसूल करणे या सर्व कामांवर तृप्ती सांडभोर यांना एक कडवट, कार्यतत्पर, कर्मठ महिला अधिकारी म्हणूनच करावे लागणार आहे. शासकीय सेवेत असल्यामुळे प्रसंगी मात्तबरांशीही झाशीची राणी बनणून लढावे लागणार आहे. तर आणि तरच शहर व महापालिका क्षेत्राचा विकास होऊ शकेल, आणि तो आपणास एक महिला अधिकारी म्हणूनच. करावा लागणार आहे एवढे नक्की ! लगे रहिये मॅडम, शुरुवात तो च्छी की है आपने. अगर काम करने का यही तरी का फास्ट ट्रॅक जैसा रहेगा तो, विकास बिलकुल दूर नहीं है. ऐसाही विश्वास जताना कोई गवत नहीं है. श्री गणेशाच्या आगमन काळात कर्तव्याला झालेली सुरुवात नक्कीच लौकिकास पात्र अशीच राहील असा विश्वास बाळगायला काहीच हरकत नाही.